salher-Fort 
महाराष्ट्र बातम्या

मराठ्यांच्या शौर्याचा साक्षी साल्हेर भाडेतत्वावर..!

संजय मिस्कीन

मुंबई : राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर देताना छत्रपती शिवाजी राजे यांच्या शौर्याचा इतिहास असलेल्या साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश नव्या धोरणात केला आहे. साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातला दुर्ग आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच दुर्ग म्हणून साल्हेरची ओळख आहे.

1672-73 च्या दरम्यान मोगलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी समोरा समोर युध्द करून जिंकून घेतला होता. साल्हेरची लढाई ही स्वराजाच्या इतिहासातील महत्वाची लढाई मानली जाते. मराठा साम्राज्याच्या शौर्याचा साक्षीदार साल्हेरचा किल्ला आहे. या लढाईत छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी सुर्याजी काकडे यांचे बलिदान झाले होते.

मोगल सैन्याकडून हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सुर्याजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची एक तुकडी गेली होती. अत्यंत उंचीवरचा हा किल्ला कोणालाही जिंकणं अशक्य होतं. चारी बाजूनं उंच सुळके व निसरडी वाट यामुळं चढाई करणं अशक्य वाटत असताना छत्रपतींच्या कुशल युध्दनिती व कणखर मावळ्यांमुळे स्वराज्यात समाविष्ठ झाला. या किल्ल्याची लढाई समोरा समोर झाल्याने मोगलांना मावळ्यांची दहशत बसली होती. 

मराठ्यांच्या साम्राज्यात साल्हेरचं महत्व अनन्य साधारण आहे. हा किल्ला खासगी विकसकाला भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. याशिवाय, घोडबंदर किल्ला देखील खासगी विकसकाला देण्यात येणार आहे. वसईच्या किल्ल्याकडे जाताना छत्रपतींचा संबध घोडबंदरशी आलेला आहे. शिवनेरी वरून कल्याण मार्गे घोडबंदर नेच शिवाजी राजे जात असत समुद्रामार्गे व्यापार करत असत. त्यांच्या घोड्यांचा जाण्याचा मार्ग होता म्हणून या बंदराचे नाव घोडबंदर पडल्याचे सांगितले जाते. 

पहिल्या पंचविस किल्ले खासगी विकसकाला देण्याचा निर्णय झाला असून सुरूवातीला नऊ किल्ल्यांची यादी समोर आलेली आहे. यामधे साल्हेर, घोडबंदर, कंधार, नगरधान, नांदूर, कोरीगड, लालिंग, पारोळा या किल्ल्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT