महाराष्ट्र बातम्या

...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत

पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिम्मित उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असे ठाम वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. 'साम' टीव्हीला दिलेल्या विषेश मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी राऊतांनी शेतकरी कृषी कायद्या संदर्भात प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे परत आणू शकतात. नरेंद्र मोदी कधीही झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला. कधी कृषी कायदे मागे घेतले? १३ राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला. दुर्दैवाने उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने प्रस्ताव मांडला आहे. आता त्यावर कोणता निर्णया होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार हे सरकार चालवतात का? यावर राऊत म्हणाले, पवार हे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी काही सुचविले तर ते राबवायला पाहिजे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये इतकी कुरबुर नाही. भाजप-शिवसेना सरकार असताना भांडी वाजून फुटत होती. इथे मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणाचा हस्तक्षेप नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT