महाराष्ट्र

...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिम्मित उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असे ठाम वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. 'साम' टीव्हीला दिलेल्या विषेश मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे पाच वर्षानंतर आघाडीसरकारकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी राऊतांनी शेतकरी कृषी कायद्या संदर्भात प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायदे परत आणू शकतात. नरेंद्र मोदी कधीही झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला. कधी कृषी कायदे मागे घेतले? १३ राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला. दुर्दैवाने उत्तर प्रदेशामध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने प्रस्ताव मांडला आहे. आता त्यावर कोणता निर्णया होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार हे सरकार चालवतात का? यावर राऊत म्हणाले, पवार हे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी काही सुचविले तर ते राबवायला पाहिजे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये इतकी कुरबुर नाही. भाजप-शिवसेना सरकार असताना भांडी वाजून फुटत होती. इथे मुख्यमंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणाचा हस्तक्षेप नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT