sharad pawar meets PM Modi 
महाराष्ट्र बातम्या

"संजय राऊतांवर कारवाईची गरज नव्हती"; मोदींच्या भेटीत चर्चा झाल्याचं पवारांकडून स्पष्ट

नवाब मलिकांवरील कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नाही- शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Goregaon Patra Chawl Scam) संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता(ED Attaches Sanjay Raut Property) ईडीने जप्त केली. यावरून राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली.यावेळी त्यांनी शिवसेना नेते राऊतांवरील कारवाईचा मुद्दा मांडला. संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाई करण्याची गरजच काय होती असा सवाल त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात झालेल्या कारवाया संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरजच होती का असा सवाल उपस्थित करत नवाब मलिकांवरील कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेणार असल्याचीही माहिती दिली.

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधीच भाजप सोबत नव्हती.सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत . महाविकास आघाडी सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार असल्याचेही ते म्हणाले. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही असे प्रत्यूत्तर सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्कव्यावर शरद पवार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT