zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळा, अंगणवाड्यांना गेले तडे! सोलापूर जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळा, ५७५ अंगणवाड्यांमध्ये पुराचे पाणी; शालेय पोषण आहार खराब, शैक्षणिक साहित्य गेले वाहून

जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळा तर एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या ५७५ अंगणवाड्यांमधील पोषण आहार पुराच्या पाण्यामुळे खराब झाला आहे. अनेक ठिकाणचा पोषण आहार वाहून गेला आहे. त्यामुळे या शाळा, अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी तातडीने पोषण आहाराची सोय करावी लागणार आहे. जेणेकरून, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील चूल पेटणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सीना नदीला महापूर आल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७२७ पैकी बार्शी, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यातील ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, संगणक, पुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. या तालुक्यातील १८१ अंगणवाड्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

सीना-कोळेगाव, चांदणी, खासापूर या धरणातून व भोगावती नदीतून सव्वादोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्याने सीना नदीला महापूर आला होता. नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने २३ व २४ सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्यात आली होती. शाळांमध्ये देखील पाणी होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यांतील ४३१ शाळांना महापुराचा फटका बसला आहे. पाणी ओसरेल तसे त्या ठिकाणी दुरुस्ती, स्वच्छता केली जाणार आहे.

तूर्तास, ज्या शाळांमधील वर्गखोल्यांचे छत गळत आहेत, ज्या शाळांमध्ये अजूनही पाणी आहे त्या ठिकाणच्या शाळा समाजमंदिर, मंदिरांमध्ये भरविल्या जात आहेत. पण, पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांची दप्तरे पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांना दप्तराविना शाळेत बसावे लागत आहे. त्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांची सोय पर्यायी ठिकाणी

सीना नदीच्या महापुरामुळे जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. शालेय साहित्य, पोषण आहार, ई-रेकॉर्ड, संगणक याचे नुकसान झाले असून अनेक वर्गखोल्यांचे छत गळत आहेत. त्यामुळे त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय पर्यायी ठिकाणी करण्यात आली आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

५७५ अंगणवाड्यांना भेगा, छत गळती

सीनेच्या काठावरील गावांमधील १८१ अंगणवाड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण ५७५ अंगणवाड्यांना भेगा पडल्या आहेत. अनेक अंगणवाड्यांचे छत गळत आहेत. पोषण आहाराचे धान्य देखील पाण्यात वाहून गेले तथा खराब झाले आहे. काही अंगणवाड्यांमधील फरशी उचकटली आहे. दुरुस्तीसाठी साधारण चार कोटी ६४ लाख रुपये लागणार आहेत.

पोषण आहाराची करावी लागणार व्यवस्था

जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळा तर एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या ५७५ अंगणवाड्यांमधील पोषण आहार पुराच्या पाण्यामुळे खराब झाला आहे. अनेक ठिकाणचा पोषण आहार वाहून गेला आहे. त्यामुळे या शाळा, अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी तातडीने पोषण आहाराची सोय करावी लागणार आहे. जेणेकरून, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील चूल पेटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT