Vittal Rukmini Sakal
महाराष्ट्र बातम्या

मनाचिये वारी : भावभक्तिचा सोहळा

वेळापूरकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा सकाळी ठाकुरबुवाच्या समाधीजवळ रिंगणासाठी थांबतो. तेथील शेतात माऊलींचे रिंगण रंगते. ठाकुरबुवा हे माउलीभक्त.

शंकर टेमघरे

वेळापूरकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा सकाळी ठाकुरबुवाच्या समाधीजवळ रिंगणासाठी थांबतो. तेथील शेतात माऊलींचे रिंगण रंगते. ठाकुरबुवा हे माउलीभक्त. त्यांचे येथे समाधी मंदिर आहे. त्यामुळे येथे रिंगणाचा सोहळा होतो. अनेकदा येथील शेतकरी रिंगणासाठी आपल्या शेतात काही लागवड करीत नाही. रिंगणासाठी शेत मोकळे ठेवतात. सोहळा पुढे निघून गेल्यानंतर तेथे पिकांचे नियोजन केले जाते. तोंडले बोंडलेमध्ये दुपारचा विसावा असतो.

तोंडले बोंडले येथे अनेक संतांच्या पालखी सोहळे एका मार्गावर येतात. बोरगावमार्गे तुकोबारांयाचा सोहळा या मार्गावर येतो. तर सोपानदेव महाराजांचा सोहळाही तोंडल्याजवळ विसावा असतो. या वाटचालीत सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतो. दुपारचा विसावा घेऊन सोहळा भंडीशेगावच्या दिशेने मार्गस्थ होतात. पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताना माउली-सोपानदेव भेटीचा सोहळा असतो. हा सोहळा पाहण्यासाठी वारकरी आणि परिसरातील गावातील भाविक टप्प्यावर गर्दी करतात.

माउलींचा पालखी सोहळा टप्प्याजवळ थांबतो. त्यापाठोपाठ सोपानदेवांचा पालखी सोहळा तेथे येतो. दोन्ही रथ शेजारी-शेजारी उभे केले जातात. दोन्ही सोहळ्यातील मानकरी एकमेकांना भेटतात. दोन्हीकडून मानाचे नारळप्रसाद दिला जातो. बंधूभेटीचा हा सोहळा पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावतात. हा भावनिक सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित होतो आणि सोपानदेवांचा रथ पुढे मार्गस्थ होतो. त्यावेळी दोन्ही संतांच्या दर्शनासाठी उपस्थितीतांची झुंबड उडते.

आळंदी ते पंढरपूर या वाटचालीत अनेक आनंदाचे सोहळे होतात. त्यात उभी, गोल रिंगणे, धावा, भारुडे यांचा समावेश असतो. मात्र, बंधूभेटीचा सोहळा भावनिक होतो. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी या भावंडांना झालेल्या कष्टमय यातनांच्या स्मरणानेच भाविकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. दोन्ही रथ शेजारी उभे केल्यानंतर पुडलिकवरदा हरी विठ्ठल असा जयघोष होतो. तेव्हा अवघा सोहळा सद्गदित होतो. तेव्हा या भावंडांवर वारकऱ्यांची अतूट श्रद्धा अधोरेखित होते. आजही संतांच्या विचारांवर लाखो वारकऱ्यांचा विश्‍वास आहे. वारी हा त्याचाच एक आविष्कार आहे. गेल्या दोन वर्षांपासून वारी होत नाही; पण मनाच्या घरोघरी मनाची वारी सुरू आहे. जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागली आहे, वारकऱ्यांमधील हुरहूर वाढू लागली आहे. मात्र, मनवारीशिवाय सुयोग्य असा कोणताही उपाय यंदा तरी दिसत नाही.

गेल्या दोन वर्षांपासून वारी येत नाही. दरवर्षी वारीच्या निमित्ताने आमच्या गावातील अनेक संतांचा सहवास लाभतो. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते. मात्र, आज गावात नैराश्याचे वातावरण होते. आम्ही माउलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी पूजन केले. मात्र, कोरोना जाऊन पुन्हा माउलींच्या रूपाने नवचैतन्य प्राप्त होवो, ही प्रार्थना.

- संजय रणखांबे, माजी उपसरपंच, भंडीशेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Ulhasnagar: महिला दिनाच्या ३ तासाच्या कार्यक्रमाला २२ लाख खर्च, ५० जणांना फेट्यासाठी ७५ हजार, तर नाश्ता अन् जेवणाचे १० लाख

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT