Vittal Rukmini
Vittal Rukmini Sakal
महाराष्ट्र

मनाचिये वारी : दासाचाही दास व्हावे...!

शंकर टेमघरे

फलटणच्या विस्तीर्ण तळावर वाढीव तिथी आली, की माऊलींच्या सोहळ्याचा मुक्काम वाढतो. त्यावेळी परिसरातील भाविकांनाही ही पर्वणीच असते. फलटणमध्ये पालखीचा मुक्काम दोन दिवस असला, की पश्चिम महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने येथे माऊलींच्या दर्शनाला येतात. रात्रंदिवस दर्शन सुरू असले, तरी भाविकांची रांग हटत नाही. मोठ्या तळामुळे वारकऱ्यांनाही येथे चांगली सोय होते. प्रशासनही येथे काही कमी पडू देत नाही. पंढरीच्या या वाटेने चालणारा प्रत्येक जण वारकरीच. वारकरी दिंडीत भिशी भरून अठरा दिवसांची आपली व्यवस्था करून राहतात. पण, ज्यांना दिंडीत पैसे देणे शक्य नाही, पण वारीत चालण्याची इच्छा आहे, असे भाविक सोहळ्याच्या पुढे किंवा मागे चालतात. त्यांच्या डोक्यावर कपड्याची पिशवी असते. जिथे मिळेल तिथे जेवण, गावातील मंदिरात किंवा कोणाच्या ओट्याच्या ओसरीला झोपायचे. गेल्या काही वर्षांपासून अशा वारकऱ्यांची संख्या वाढत आहे.

दिंडीतील वारकरी वाटचालीत चालताना कोणी वाटप करीत असेल, तर ते घेत नाहीत. त्यांना दिंडीत आवश्यक त्या सुविधा असतात. दिंडीत चालणारे वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम पाळतात. अगदी दिंडीत चालताना एका रांगेत चालणारे चार वारकरी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत सारखेच असतात. अशा शिस्तीचे पालन करणारे असंख्य दिंड्या आहेत. दिंडीतील नियम वारकरी तंतोतंत पाळतात. दिवसभर चालून गेल्यावर गरमागरम जेवण, झोपण्यासाठी तंबूची सोय तयार असते. त्यामुळे दिंडीतील वारकरी अन्यत्र जेवणासाठी जाताना बहुधा दिसत नाहीत. पण, गावोगावी घरोघरी जे अन्नदान केले जाते, तेथे ही मुक्तवारी करणाऱ्यांसाठी असते. काही दिंड्यांना स्थानिक ठिकाणी पंगत असते, पण ही अपवादानेच.

ग्रामस्थांच्यादृष्टिने दिंडीतून चालणारे आणि मुक्तपणे चालणारे वारकरीच. त्यामुळे ते सेवा समजून अन्नदान करतात. पुण्यापाठोपाठ फलटणमध्ये अन्नदान केले जाते. वारकरी वाढीव दिवशी दिवसभर विश्रांती घेणेच पसंत करतात. फलटणकर मात्र, माऊलींच्या सोहळ्याच्या मुक्कामाचे सेवेतून सोने करून घेतात. शहरात मंगलमय वातावरण नांदत असते. वारीत आलेले वारकरीही येथील ऐतिहासिक राम मंदिराच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. संस्थानिकांच्या स्वागताने अवघे वैष्णव भारावून जातात.

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची, मसाज, केशकर्तनालय, चपला शिवणे असे अनेक उपक्रम राबवून आम्ही त्यांच्या सेवेचा लाभ घेत असतो. पण, गेल्या दोन वर्षांपासून ही सेवा वारी रद्द झाल्याने खंडित झाली आहे. वारी नसल्याने उदास वातावरण आहे. यातून लवकर सुटका होऊन वारी पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.

- किशोरसिंह नाईक निंबाळकर, अध्यक्ष शंकर व्यापारी युवक मंडळ, फलटण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT