Shrad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे..." ; शरद पवारांचा थेट हल्ला

Sandip Kapde

Sharad Pawar : उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली.

बंड केलेले सर्व आमदार, खासदार उद्धव ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, अशी तक्रार करत होते. अनेक शिवसेनेतील अनेक नेत्यांना मातोश्री व वर्षा बंगल्याबाहेर उद्धव ठाकरेंच्या भेटीची वाट पाहावी लागत होती. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

दरम्यान शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रकृतीचा विचार करुन भेट घ्यावी लागत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलताना संवादातील सहजता जाणवत नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती यामुळे भेटायला वेळ ठरवावी लागत होती, असा खुलासा शरद पवार यांनी पुस्तकात केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं वर्तमान कळत होतं, यावेळी मी वडिलकीच्या नात्यांने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडिंची बितंबातमी हवी. त्याचं यावर हारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल. याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरलवायचं राजकिय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं, असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरीक अस्वास्थ्य हेच असावं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनत वादळ माजेल, याचा मात्रा आम्हला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे शरद पवार यांनी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT