Sharad Pawar Basavaraj Bommai esakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात पवारांची एन्ट्री; जत मागणाऱ्या बोम्मईंना दिलं त्यांच्याच शब्दांत उत्तर

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य शहाणपणाचं लक्षण नाहीये.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपालांनी सगळ्याच मर्यादा सोडल्या आहेत. त्यामुळं राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीच दखल घ्यावी. अशी वक्तव्य करणाऱ्यांकडं मोठी जबाबदारी देणं योग्य नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं.

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी (बसवराज बोम्मई) मागणी केली आहे, तशी मागणी आम्हीही करतो. आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी मागतो. त्याठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आहेत. त्यामुळं बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तर चर्चा शक्य आहे, असं प्रत्युत्तर पवार यांनी बोम्मईंना दिलंय.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य शहाणपणाचं लक्षण नाहीये. त्याला आमचा पुरेपुर पाठिंबा नाही. सध्या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कसंही वागा, कशाही पध्दतीची भूमिका घ्या असं त्यांचं चाललंय, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka Border) 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Karnataka CM Basavaraj Bommai) केलाय. सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोम्मईंना प्रत्युत्तर दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT