Sharad Pawar NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस'कडून 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस; 48 तासांमध्ये उत्तर देणं बंधनकारक

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे ३५ पेक्षा जास्त आमदार अजित पवार गटाकडे असल्याचं सांगितलं जात आहे. बंडानंतर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

आज अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांना खातेवाटप झालेलं आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या पक्षाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या १२ आमदारांना नोटीस पाठवलेली आहे. ५ जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आमदारांना उत्तर देण्यासाठी ४८ तासाचा अवधी उरला आहे.

'या' आमदारांना नोटीस

सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे; या आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत. यामध्ये पहिलं कृषी, दुसरं मदत आणि पुनर्वसन आणि तिसरं अन्न आणि औषध प्रशासन. या खात्यांचे मंत्री अनुक्रमे धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम हे असतील. तर भाजपकडून सहा खाती गेली आहे. यामध्ये अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, क्रीडा, महिला आणि बालकल्याण या खात्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT