Sharad pawar says I do not support Rohit pawar or parth pawar 
महाराष्ट्र बातम्या

पुढील वारस कोण? या प्रश्नावर, शरद पवार म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तुमचा राजकीय वारस कोण? या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. या मुलाखतीत पवारांचा राजकीय वारसदार कोण असेल, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी आपला कोणालाही पाठिंबा नाही, असे सांगितलं. जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी आमच्या घरात कोणताही कलह नसल्याचेही स्पष्ट केले. मी आज घरात मोठा आहे. त्यामुळे सगळे माझे ऐकतात. अजितला मी सांगितल्यानंतर तो राज्यात जोराने प्रचार करीत आहे. पक्षाचे काम करीत आहे, असे पवार म्हणालेत.  'ईडी'ने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार उद्विग्न झाले होते. याच मनस्थितीत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यासाठी कोणताही गृहकलह कारणीभूत नाही. पवार घराणे हे एका मताने वागणारे आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझ उघडा तरच बोलू! इराणचा अमेरिकेला २ टप्प्यात चर्चेचा प्रस्ताव, अटींवर ठाम

Badminton New Rules: बॅडमिंटनमध्ये आता नवा नियम; जागतिक संघटनेकडून हिरवा कंदील, २१ ऐवजी १५ गुणांचा गेम

Nagpur News: भाऊ, शहरात पाण्याचाही धर्म उरला नाही; तहानलेल्यांसाठी सोयींचा अभाव ; पाणपोई संस्कृतीच धोक्यात

Solapur News: साेलापूर जिल्ह्यात ३०० कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’; ७५० गावांचा विकास वाऱ्यावर, ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांचा पेच

पोपटांमुळे पिकाचं नुकसान झाल्यास भरपाई, मुंबई हायकोर्टाचा शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT