Sharad Pawar
Sharad Pawar टिम ई सकाळ
महाराष्ट्र

'एकदा नाही, चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होतं का?'

सकाळ डिजिटल टीम

मध्यंतरी काही लोक सोडून गेले, जे गेले ते गेले, त्याची चिंता करायचे कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी केले. ते बऱ्याच वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.

जोपर्यंत मला साथ आहे, तोपर्यंत या राज्याच्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी काम करतच राहणार, असा विश्वास त्यांनी बोलुन दाखवला. सोबतच रशिया-युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.

राज्यातील जनतेने भरभरून साथ दिली. एकदा नाही तर चारवेळा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे, असे ते यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT