Sharad Pawar Uddhav Thackeray And Raj Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर..." शरद पवारांवरील टीकेचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर

Uddhav Thackeray : "धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही."

आशुतोष मसगौंडे

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज सोलापूरात पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होईल अशी भीती व्यक्त केली होती. याबाबत ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असे विधान केले."

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाना साधला.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "त्यांनी राजकारणत परत नव्याने सुरुवात केली आहे. ते दरवर्षी नव्याने राजकारणाची सुरुवात करतात. त्यांचं राजकारण मॅच फिक्सिंगवर सुरू असते.

पवार-शिंदे भेट

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धारावी प्रकल्प आणि शिंदे-पावर भेटीचा काही संबंध आहे का? असे विचारल्यावर राऊत म्हणाले की, ते तुम्ही शरद पवार यांना विचारा. ते कशासाठी भेटले हे मला सांगता येणार नाही. ते अनेक विषयांसाठी भेटले अशी माहिती आहे.

राऊत यांनी पुढे आरोप केला की, "धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीच टेंडर रद्द करू अस उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे. धारावीबाबत आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही."

फडणवीस कच्चा लिंबू

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "लोकसभेत चक्रव्यूव्हाची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सिरियस घेत नाही. त्यांना जेलमधील गुन्हेगाराची मदत घ्यावी लागते त्यातूनच फडणवीस किती चक्रव्यूव्हामध्ये अडकले आहेत ते दिसतेय."

पुढे चांदिवाल आयोगावर बोलताना राऊत म्हणाले, "अनिल देशमुख यांनी सांगितलं तसं चंदिवाल आयोग आधी जाहीर करा मग तुरुंगातील प्रवक्त्यांन बोलायला लावा. देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू आहेत. चांदिवाल आयोगाचा अहवाल कधीही सादर झाला असता म्हणून त्यांनी आमचं सरकार पाडल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Rohit Sharma: 'आज फेअरवेल मॅच होती!', गौतम गंभीरच्या कमेंटवर रोहितने काय दिली रिअॅक्शन? पाहा Viral Video

Virginity Test: संतापजनक! आधी कौमार्य चाचणी करा, नंतरच प्रवेश... मदरशाकडून सातवीतील विद्यार्थिनीकडे प्रमाणपत्राची मागणी

Indian Railways Smart Toilet : ट्रेनमधील शौचालये फक्त ५६ सेकंदात स्वच्छ होणार! नवीन तंत्रज्ञान काय? जाणून घ्या...

Bhagvad Gita Lessons in Marathi: दुसऱ्यांच्या 'परफेक्शन'च्या मागे धावू नका; तुमचा स्वत:चा मार्गच आहे चांगला : भगवद् गीतेतील शिकवण

SCROLL FOR NEXT