महाराष्ट्र बातम्या

राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना या निकालाचा फायदा घेवून समाजात अशांतता निर्माण करता येणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आमदारांच्या बैठकीत केले. 

राष्ट्रवादी भवन मधे आज पवार यांच्या हस्ते विजयी आमदारांचे स्वागत करण्यात आले. व विधीमंडळ पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. 

"जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा"

देशात सध्या राम मंदिर निकालाची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आदर सर्वणांनीच करायला हवा. असे पवार म्हणाले. 

राज्यातील प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करताना या राज्यातील जनतेच्या मुळ समस्या व त्यावरील उपाययोजना यावरच भर द्यावा. राज्यातील आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारावा. अशी सूचना शरद पवार यांनी केली. 

आजच्या या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. विधानसभा विरोधी पक्षनेत्याची मात्र आज निवड करण्यात आली नाही. 
 

Webtile : sharad pawars statement on supreme courts verdict on ram mandir and aayodhya

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT