Shinde Vs Thackeray
Shinde Vs Thackeray  
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : "न्यायालय देखील चुकू शकतं" ; उल्हास बापट असं का म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजचा युक्तिवाद संपला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडं जाणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या सुनावणीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या तीन दिवसात न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे कोर्ट रेबिया प्रकरणानुसार निर्णय देणार की नबाम रेबिया प्रकरणातील निकालात सुधारणा करणार?, यावर उल्हास बापट यांनी त्याचे म्हणणे मांडले.

उल्हास बापट म्हणाले, न्यायालय देखील चुकू शकतं. न्यायालयाने आपले आधीचे निर्णय यापूर्वी फिरवले आहेत. न्यायालय चुकत नाही असं नाही. याआधी न्यायालयाने गोलकनाथ केसचा निकाल पुढे १३ जणांच्या घटनापीठाने बदलला होता. आधीचे निर्णय कोट केले जातात. त्यातील काही चुका सुधारून सात न्यायाधीशांचं बेंच सुधारून तो निर्णय संपूर्ण देशाला लागू होतात. 

दरम्यान कोर्टाने निर्णय राखून ठेवल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी न्यायालयीन लढाई सध्या खूपच अटीतटीची बनली आहे. 


कुठल्या मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित?

  1. प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं जाणार की नाही?

  2. नबाम प्रकरणानुसार सत्तासंघर्षाची सुनावणी होणार का?

  3. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नक्की काय आहेत?

  4. अपात्रतेच्या नोटिसांवर कारवाई नक्की कोणी करायची?

  5. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा योग्य होता का?

  6. सध्याचे सरकार राहिल की जाईल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT