Prithviraj Chavan explains Supreme Court verdict on Maharashtra political crisis Eknath shinde Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं.

हेमंत पवार

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर पूर्वस्थिती लागू करण्याचे निर्देश दिले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलं आहे.

कऱ्हाड : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. त्यांनी विधिमंडळात जाऊन अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्यासारखं भाषण करुन आपली बाजू मांडायला हवी होती. त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात होवून त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं, असं मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर माध्यमांपुढं मांडलं होतं.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) काल निकाल देताना नेमके हे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळं आमदार चव्हाणांचं निरीक्षण खरं ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात राजकीय पटलावर वेगळ्याच घडामोडी होवून मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. या सत्तासंघर्षाबद्दलचा महत्वाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयानं दिला.

त्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर पूर्वस्थिती लागू करण्याचे निर्देश दिले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर हीच भूमिका माध्यमांपुढं मांडली होती. ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. घाईघाईत राजीनामा देऊन त्यांनी मोठी चूक केली आहे.

त्यांनी विधिमंडळात जाऊन भाषण करायला हवं होतं. आपली बाजू मांडायला हवी होती. ठाकरेंनी त्यांच्यापुढची परिस्थिती सदनात मांडली असती, तर त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात झाली असती. त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार चव्हाण यांनी उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं काल निकाल देताना यातील मुद्दे मांडले आहेत. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांचं मत खरं ठरल्याची चर्चा सध्या सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT