Vinayak Raut vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Politics : एकनाथ शिंदे सुद्धा 'मातोश्री'वर माफी मागायला आल्यास..; राऊतांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलं मोठं विधान

'शरद पवार यांच्याबाबत कोणीही गैरसमज करू नये'

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ध्वजवंदनाचा मान कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांना देणे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सावंतवाडी : सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आक्रमणानंतर शिंदे गटाची अधोगती सुरू आहे. शिंदे गटाचे पंधराहून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे भाकित विनायक राऊत यांनी केले.

भविष्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा ''मातोश्री''वर माफी मागायला आल्यास आश्चर्य नाही; परंतु ''मातोश्री''वर गद्दारांना माफी नाही, हे ठरलेले आहे. गळाभेट इतर करतात; परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार नाही, असंही खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी येथे स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा खासदार महाविकास आघाडीचाच असणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना खासदारकी लढविण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या पराभवाचा आकडा किती असेल, ते आत्ताच निश्चित करून ठेवावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘‘अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट लपून राहिली नाही. त्यांना भेटायचे होते तर त्यांनी उघड-उघड भेटणे गरजेचे होते; मात्र, त्यांची भेट झाली तरी शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत. याशिवाय ते ''इंडिया''मध्येही भक्कमरित्या आहेत. येणाऱ्या काही दिवसातच ''इंडिया''ची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे.

त्यामुळे शरद पवार यांच्याबाबत कोणीही गैरसमज करू नये. दुसरीकडे भाजपबरोबर अजित पवार आल्याने सरकारमधील त्यांच्या आक्रमणानंतर शिंदे गटाची अधोगती सुरू झाली आहे. त्यांचे तब्बल १५ हून अधिक आमदार आज ठाकरे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. या संदर्भात पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.’’

ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांचे लोकसभेतील भाषण ऐकून लाज वाटली. सिंधुदुर्गाला बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या विद्वान संसदपटूंचा वारसा लाभला आणि आम्ही त्यांचाच आदर्श घेऊन चाललो; मात्र नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही त्यांनी संसदेमध्ये आपले वैचारिक दारिद्र्य दाखवून दिले. ते एक प्रकारे कोकणला लागलेले दूषणच म्हणावेच लागेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ध्वजवंदनाचा मान कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर यांना देणे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मणिपूर येथे दोन गटांत सुरू असलेला वाद व तेथील एकूणच परिस्थिती पाहता आता पंतप्रधानांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मणिपूरमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.’’ यावेळी त्यांच्यासोबत बाळा गावडे, मंदार शिरसाट, जान्हवी सावंत आदी होते.

अन्यथा स्वस्थ बसू देणार नाही!

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न लक्षात घेता वन विभागाने ऑक्टोबरपासून हत्ती प्रतिबंध कारवाई हाती घ्यावी. तसे न झाल्यास आम्ही प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही. या संदर्भात मी, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे. हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करायचा असेल, तर कर्नाटकशिवाय पर्याय नाही. कर्नाटक शासनासोबत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या व उपाययोजना आखा, अशा सूचना दिल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT