महाराष्ट्र

युती पुन्हा होणार? फडणवीसांचं शिवसेनेबाबत सूचक वक्तव्य, म्हणाले…!

नामदेव कुंभार

‘‘भाजपचे शिवसेनेशी कोणतेही शत्रुत्व नाही. आमच्यात केवळ मतभेद आहेत. आम्ही हातात हात घालून एकत्र निवडणूक लढलो, पण ते ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांचा हात त्यांनी हातात घेतला. त्यामुळे मतभेद झाले. जर तरला काही अर्थ नसतो. राजकारणातले निर्णय ज्या त्या परिस्थितीत होत असतात,’’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष भाजपची दादर येथील कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर आमदारही उपस्थित होते.

‘‘राज्य सरकार कोरोना साथीच्या नावाखाली पळ काढतेय. लोकशाहीला कुलूप लावण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, आम्ही माध्यमांसमोर, रस्त्यावर जनतेच्या हिताचे प्रश्न मांडू,’’ असेही फडणवीस म्हणाले.

कोरोना साथीमुळे अधिवेशनाचा कालावधी सरकारने कमी केला आहे. यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘‘लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेल्या सगळ्या प्रथा, परंपरा, पायंडे पायदळी तुडवली जात आहेत. अधिवेशनात एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान गैरव्यवहार, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार आदींचे कोणतेच प्रश्न मांडायचे नाहीत. भ्रष्टाचार मांडायचा नाही, याची व्यवस्था सरकारने केली असून हे सरकार विरोधी पक्ष आणि माध्यमांना तोंड द्यायला तयार नाही.’’

‘‘राज्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये उल्लेख नसल्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे,’’ असेही ते म्हणाले. ‘‘ओबीसी आरक्षण प्रश्न देशात नाही तर, केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. ओबीसी आरक्षणासाठी केंद्राच्या नाही तर, राज्य मागासवर्ग आयोगाच्या डेटाची गरज आहे. उशिरा का होईना पण आता तेच काम राज्य सरकारने हाती घेतले असून, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,’’ असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

अध्यक्ष निवडीबाबत साशंकता

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होईल किंवा कसे? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शंका व्यक्त केली. ‘‘आघाडी एकत्र आहे आणि बहुमत आहे मग अध्यक्षपद रिक्त का ठेवता? हा आमचा सवाल आहे. सध्या आघाडीतील तिन्ही पक्षात विसंवाद आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे चित्र दिसत नाही,’’ असे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT