shivsena Anil parab on rutuja latke andheri byelection mumbai high court decision  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri Byelection: अजूनही वेळ गेलेली नाहीये! मोठं मन दाखवून निवडणूक बिनविरोध करा; ठाकरे गटाचं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: नामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केलं आहे.

हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवेसनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी अंधेरी पोटनिवडणूकीत उमेदवारी दिली आहे, परंतु साधं हे प्रकरण होतं पण त्यांनी निवडणूक लढू नये यासाठी शेवटतच्या मिनीटांपर्यंत प्रयत्न केले गेले असे अनिल परब यांनी सांगितले. सरळ तरतुदी असताना देखील हायकोर्टात जावं लागलं ही दुर्दैवी बाबा आहे, असेही ते म्हणाले.

एखादी विधवा महिला निवडणूकीला उभी राहते तेव्हा तेव्हा तीच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण असायला पाहिजे. ऋतुजा लटके यांनी तीन तारखेला राजिनामा दिला आहे आणि त्या कार्यालयात देखील जात नाहीत आणि १२ तारखेला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सांगितले गेले यावरू राज्यातील राजकारण किती खालच्या पातळीवर सुरू आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे असेही अनिल परब म्हणाले. न्यायदेवतेने आज न्याय दिला आहे. उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्या राजिनामा मान्य केला जाईल आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अर्ज भरण्यात येईल असे अनिल परब म्हणाले.

शिवसेनेकडून ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरतील, तर शिंदे-भाजप गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही अशा वेळी ही निवडणूक बिनविरोध होईल का? याविषयी विचारले असात परब म्हणाले की, हे आवाहन मी पहिल्या दिवशीच केलं आहे, महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे, आजही महाराष्ट्रीतील राजकारण खालच्या पातळीला गेलंय असं म्हणणार नाही. पण आता जे काय चाललंय ते चांगलं नाही. आजवर एखाद्या सदस्याचा मृत्यू आणि पोटनिवडणूकीसाठी सदस्य़ाच्या घरातील कोणी उभं राहीलं तर महाराष्ट्रात बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. आता देखील त्यांनी मोठं मन दाखवावंआणि निवडणूक बिनविरोध केली तर लोकांना वाटेल की महाराष्ट्रात अजून ती संस्कृती आहे, असे ते म्हणाले.

परब पुढे म्हणाले की, मी पहिल्या दिवशी आवाहन केलं आहे, आजही आवाहन करतो, महिलेवर दुखःचा डोंगर आहे, महिलेच्या घरातील व्यक्ती अगदी कमी वयात जग सोडून गेला. अशावेळी महिलेला मतांसाठी जनतेसमोर जाणे योग्य नाही. पण रमेश लटके यांनी केलेलं काम यासाठी आम्ही त्यांच्या घरच्यांना उमेदवारी दिली आहे. अशा वेळी ते याचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असा विचार केला तर चांगली बाब आहे असे परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT