महाराष्ट्र

Chipi Airport: 'शेवटी पायगुण लागतो', मंचावरुनच सुभाष देसाईंचा टोमणा

दीनानाथ परब

मुंबई: "आज सिंधुदुर्गात चिपी विमानतळाच (chipi airport) उद्घाटन हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. इथून पुढे चिपी विमानतळावरील सर्व विमान उड्डाण फुल असावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो, असा राज्य सरकारमधील मंत्री सुभाष देसाई (subhash desai) म्हणाले. १९९२ मध्ये तेव्हाचे मंत्री माधवराव सिंधिया यांनी विमानतळासाठी सिंधुदुर्गाची हवाई पाहणी केली होती. आज २७-२८ वर्षांनी हा योग जुळून आला आहे" असे देसाई यांनी सांगितले.

"काही जणांनी विमानतळ सुरु व्हायला इतका विलंब लागला अशी प्रतिक्रिया दिली. पण शेवटी पायगुण लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रुपाने हा पायगुण लाभला आहे. सिद्ध झाला आहे" असा टोला सुभाष देसाईंनी लगावला. चिपी विमानळाच्या उद्घाटन कार्यक्रमात नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित आहेत. नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे यांनी आज सकाळी शिवसेनेमुळे चिपी विमानतळ सुरु व्हायला सात वर्षांचा विलंब लागला असे विधान केले होते.

"या विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा केला. खासकरून विनायक राऊत यांनी 7 वर्षात 1 महिना गेला नसेल की, त्यांनी पाठपुरावा केला नाही. एमआयडीसी सुद्धा पाठपुरावा करत होती. या सगळ्याच प्रयत्नांना यश आल्याचा आनंद आहे. कोकणाचा खरा विकास, उत्कर्षाला आजपासून निश्चित सुरु झाली आहे" असे सुभाष देसाई म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT