महाराष्ट्र

मोठी बातमी! प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली ही माहिती; वाचा सविस्तर

- सुनीता महामुणकर

मुंबई : पर्युषण कालावधीमध्ये जैनमंदिरे खुली करण्यास राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात नकार दिला आहे. मंदिरे खुली केल्यास कोरोना संसर्ग अधिक वाढू शकतो, अशी भिती सरकार कडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास तरी सार्वजनिक प्रार्थना स्थळे खुली होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

येत्या ता. 15 ते 23 या कालावधीमध्ये जैन समुदायाचा पर्युषण उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे या कालावधीत जैन मंदिर सशर्त खुली करा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. भांडुपमधील रहिवासी यांच्या सह.अन्य एका याचिकेवर बुधवारी न्या एस जे काथावाला आणि न्या माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हीडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने एड पूर्णिमा कंथारिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे मंदिरे खुली करायला परवानगी दिली तर साथ अधिक पसरण्याचा आणि जीवाला धोका निर्माण होण्याची भिती आहे, असे मत सरकारकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच मार्गदर्शक तत्वांचा फेरआढावा घेण्यात येणार असून सप्टेंबरपर्यंत यावर निर्णय होईल, असे ही सरकारकडून सांगण्यात आले.  

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला. मंगळवारी राज्यात दहीहंडी उत्सवही साजरा झाला नाही हे सर्वांनी पाहिले असेल. त्यामुळे तूर्तास या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र राज्य सरकार याचिकादारांच्या निवेदनावर पारदर्शकपणे सुनावणी देईल, आणि सप्टेंबरपर्यंत फेर आढावामध्ये यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.

 जैन समुदाय कमी आहे, त्यामुळे एवढी मर्यादित कालावधीसाठी असलेली मागणी मान्य करा अशी विनंती याचिकादारांकडून करण्यात आली. मात्र सर्वच दिवस पवित्र असतात आणि आत्मभान आपल्यामध्येच असते, सर्वच समुदायांची काळजी आहे,
असे न्यायालय म्हणाले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT