Mahavikasaghadi 
महाराष्ट्र बातम्या

आघाडीतील मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी काय दिल्या कडक सूचना

प्रशांत बारसिंग

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील संवेदनशील माहिती बाहेर फुटू नये, यासाठी फडणवीस सरकारच्या काळातील भाजप मंत्र्यांच्या आस्थापनावरील खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करू नये, अशा कडक सूचना आघाडीतील मंत्र्यांना तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. तेव्हापासूनच शेकडोंच्या संख्येने राज्याच्या प्रशासनातील अधिकारी आपल्या नियुक्‍तीसाठी नव्या मंत्र्यांच्या मागे फिरत आहेत. यामध्ये फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडे काम केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या रविवारी मंत्र्यांकडील खात्यांचे वाटप करण्यात  आले. सुरवातीला शपथ घेतलेले सहा मंत्री, त्यानंतर विस्तार झाल्यावर सर्व मंत्र्यांना हे अधिकारी नियुक्‍ती करण्याची विनंती करत आहेत.

संबंधित नियुक्‍त्या करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी नव्याने सूचना केल्याने अनेक मंत्री खासगी सचिव आणि ओएसडींच्या नियुक्‍त्या करताना गंभीरपणे विचार करत आहेत. सध्या १०५ आमदार असल्याने भाजप प्रबळ विरोधी पक्ष आहे. महाविकास आघाडीला खाली खेचण्याची संधी विरोधक सोडणार नसल्याची बाब स्पष्ट आहे. त्यामुळे सरकार चालविताना महाविकास आघाडी सरकारला अनेक गोष्टींचा बारीकसारीक विचार करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT