Sudhir Mungantiwar Pay compensation in time otherwise charge interest new law regarding wild animal attacks
Sudhir Mungantiwar Pay compensation in time otherwise charge interest new law regarding wild animal attacks  sakal
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : भरपाई वेळेत द्या, अन्यथा अधिकाऱ्यांकडून व्याज वसूल करू; सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्यातील जखमी नागरिकांना आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई ३० दिवसांच्या आत न भरपाई रक्कम देणे बंधनकारक आहे. ते न दिल्यास त्या रकमेवरील सरकारी दराने व्याज अधिकाऱ्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत गुरुवारी दिले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात बिबट्यांचा वाढलेला वावर, ७७ बिबट्यांनी ५०० जनावरे ठार केली आहेत. तसेच एका लहान मुलाचाही बळी घेतल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि मानसिंग नाईक यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. या चर्चेत समीर कुन्नावार, अनिल बाबर, नाना पटोले, दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला.

बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला असून त्यामुळे जीवितहानीचा धोका आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांचे नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जलद कृती दलाची स्थापना करण्याची गरज आहे, अशी मागणी पाटील यांनी केली.

तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना,जखमींना तसेच पिकांच्या नुकसानीबद्दल भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई दिली जात नाही,असा मुद्दाही उपस्थित केला. तसेच गडचिरोलीप्रमाणे बिबट्यांचा वावर वाळवा आणि शिराळा तालुक्यात शेतीला दिवसा वीज द्यावी, अशी मागणी केली.

‘‘नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी सरकार दक्ष आहे. पण अधिकाऱ्यांच्या पातळीवर जर दिरंगाई होत असेल तर तसा कायदा करून ३० दिवसांच्या आत देणे बंधनकारक करू. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्याकडून सरकारी दराने व्याज वसूल करून ती मदत शेतकऱ्यांना दिली जाईल.

तसेच वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान, हल्ले, त्यावरील उपाययोजना, सरकारी मदत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी केलेले उपाय आदींबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल.

ही समिती या उपाययोजनांतील त्रुटींचा अहवाल पुढील अधिवेशनाच्या आधी सरकारला देईल,’’ असे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक यांनी पीक नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. पीक उगवून आलेले असते तेव्हा त्याचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले तर ते पीक काढणीला आले नसल्याचे सांगून अधिकारी भरपाई नाकारतात.

हा नव्याने शोध अधिकारी लावत आहेत. पीक लहान मोठे नसते. त्यामुळे त्याची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी बिबट्यांच्या प्रजनन क्षमतेवर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली.

चूक वनधिकाऱ्यांची नाही तर उपमुख्यमंत्र्यांची

गाणी लावण्याच्या सल्ल्यावर जयंत पाटील यांनी मिश्किल टिपण्णी करत, वनअधिकारी गाणी लावायला सांगत असतील तर ती अधिकाऱ्यांची चूक नाही, ती चूक उपमुख्यमंत्र्यांची आहे. मुनगंटीवार यांना वन आणि सांस्कृतिक खाते दिल्याने वनात गाणी लावायचा सल्ला दिला जात आहे, असा टोला लगावताच सभागृहात हशा पिकला.

आमदारांची घेतली शाळा

अनिल बाबर यांनी बिबट्यांना रोखण्याची मागणी केल्यानंतर ‘बिबटे गावाजवळ आले तर गाणी लावा, असा अजब सल्ला वनअधिकारी गावकऱ्यांना देतात,’ असे बाबर यांनी सांगितले. यावर वनमंत्र्यांनी बाबर यांचीच शाळा घेतली. आपण आमदार आहात, आपल्याला सरकार पगार देते, त्यातून लेटरहेड छापून घ्या आणि लेटरहेडवर त्याबाबत तक्रार करा, लक्षवेधी लागेपर्यंत वाट कसली बघता. असा कुठला अधिकारी सल्ला देत असेल तर आपण त्यांना गाणी ऐकण्यासाठी भरपूर वेळ देऊ, असेही ते म्हणाले.

एक लाख शेतकऱ्यांना कुंपण

वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा वावर असलेल्या ठिकाणच्या एक लाख शेतकऱ्यांना कुंपण देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्र्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT