महाराष्ट्र बातम्या

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत 'या' दिवशी होणार सुनावणी...

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 10 : कोरोना साथीमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. आपत्कालीन विभागाने नकार दिला असतानाही युजीसीला परीक्षा घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल खंडपीठाने युजीसीला केला आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने केलेल्या प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

महाराष्ट्र आणि दिल्ली राज्य सरकारने कोविड19 मुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षा रद करण्याचा अधिकार सरकारांना नाही असा दावा आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युजीसीच्या वतीने केला. जर परीक्षा नाही दिल्या तर विद्यार्थ्यांना कायद्याने पदवी मिळणार नाही, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. युजीसीने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना दिले आहेत.

महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अवधी मागितला. त्यामुळे खंडपीठाने सुनावणी ता. 14 रोजी निश्चित केली. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने निर्देश दिले असतानाही विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेऊ शकते का, यावर खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. मुंबईसह देशभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा विरोधात आणि समर्थनार्थ न्यायालयात याचिका केल्या आहेत. 

( संकलन - सुमित बागुल )

supreme court to give hearing on final year final exams on this friday

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT