महाराष्ट्र

अवघ्या तीन वर्षांत कॅबिनेट मंत्रीपद मिळविणारे तानाजी सावंत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसेनेतील अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. 

मूळ सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील तानाजी सावंत यांनी जेएसपीएम ही शिक्षण संस्था नावारूपाला आणली. नंतर त्यांनी साखर उद्योगात काम सुरू केले. भैरवनाथ शुगर या नावाने खाजगी साखर कारखाने काढून ते चालवून दाखवले.

तीन वर्षापुर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लगेच त्यांनी यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून विधान परिषदेचे तिकीट मिळवले. ती निवडणूक मोठ्या मतांनी जिंकली. पुढे दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांचा तानाजी सावंत यांच्यावरील विश्वास वाढत गेला. त्यांना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बनवण्यात आले. मध्यंतरी पंढरपुरात सावंत यांनी उद्घव ठाकरेंचा मोठा मेळावा यशस्वी केला. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच आग्रहावरून उस्मानाबादची उमेदवारी बदलण्यात आली. तो निर्णय सावंत यांनी यशस्वी करून दाखवला. या पद्धतीने यशाचा चढता असलेल्या सावंत यांनी राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून आज शपथ घेतली. अवघ्या तीन वर्षात त्यांनी घेतलेली झेप अचंबित करणारी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT