satyajeet tambe eSakal
महाराष्ट्र बातम्या

Team India Parade: हा तर शुद्ध वेडेपणा! दुसरे हाथरस घडले असते; टीम इंडियाच्या मिरवणुकीवर सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

Satyajeet Tambe On Team India Parade: अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विजयी भारतीय क्रिकेट टीमची मुंबईमध्ये भव्य मिरवणूक झाली. यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहते इतक्या मोठ्या संख्येने आले होते की, काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये हाथरससारखी घटना घडली नाही, याबाबत देवाचे आभार. 'फर्स्ट कम, फर्स्ट सीट' अशा प्रकारची सुविधा वानखेडेवर करण्यात आली होती. प्रशासनाकडून हे किती बेजबाबदार प्रकारचं नियोजन होतं. इतकी मोठी रिस्क प्रशासनाने कशी घेतली? काहीच दिवसांपूर्वी हाथरसमधील चेंगराचेंगरीl १२१ लोक मृत्युमुखी पडलेत, हे प्रशासन विसरलंय का? असा सवाल तांबे यांनी केलाय.

हे देशाबाबत किंवा क्रिकेट टीमबाबत प्रेम नाही तर हा शुद्ध वेडेपणा आहे. गोंधळ आणि बेजबाबदारपणा पेक्षा सुरक्षा आणि शहाणपणाला जास्त महत्त्व द्या, असं तांबे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.



गर्दीच्या नियोजनात प्रशासन अपयशी

भारत माता की जय, मुंबईचा राजा रोहित शर्मा, बूम बूम बुमराह... अशा घोषणाबाजीमुळे संपूर्ण चर्चगेट स्थानक परिसर दुपारपासून दुमदुमून गेला होता. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचे पोस्टर घेऊन हजारोंच्या जथ्थ्याने क्रिकेटप्रेमी चर्चगेट स्थानकावर जमत होते. अनपेक्षित गर्दी झाल्यामुळे आणि ढिसाळ सुरक्षा नियोजनामुळे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले.

दोन तास उशीर

टी-२० वर्ल्डकप जिंकून चार दिवस झाले. त्यामुळे विजय मिरवणुकीची तयारी अगोदर होणे अपेक्षित होते; मात्र ढिसाळ नियोजनामुळे चर्चगेट ते नरिमन पॉईंटदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासनाला अपयश आले. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे पाच वाजता ठरलेल्या मिरवणुकीला दोन तास उशीर झाला.

मुख्यमंत्र्याचा फोन

क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरिमन पॉईंट ते स्टेडियमदरम्यान, मरीन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतूक विस्कळित होऊ नये; तसेच जमलेल्या क्रिकेटप्रेमींना कोणताही त्रास होऊ नये, याकडे मुंबई पोलिस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, आनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीद्वारे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INC आता IMC बनलंय, नेहरुंमुळे वंदे मातरमचे तुकडे; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर घणाघात

Year End 2025: शनीने 2025 मध्ये काय काय केले? जाणून घ्या भ्रमणापासून नक्षत्र बदलापर्यंत, एका क्लिकवर

IND vs SA 1st T20I पूर्वी टीम इंडियाचा विक्रम स्पेनने मोडला, ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड

प्राइम व्हिडिओ आणणार ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’चा शेवटचा सीझन, 19 डिसेंबरला होणार प्रीमियर

Most ODI Runs in 2025: ज्यांच्या निवृत्तीसाठी देव पाण्यात ठेवले, त्या विराट कोहली, रोहित शर्माने वर्ष गाजवले; भन्नाट आकडेवारी

SCROLL FOR NEXT