zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांसाठी TET बंधनकारकच! २३ नोव्हेंबरच्या ‘टीईटी’साठी ३.३६ लाख अर्ज; अर्जासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदत; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर अजून नाही पुरर्विचार याचिका

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ‘टीईटी’साठी अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे अर्जाची मुदत ३ ऑक्टोबरऐवजी आता ९ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी (ता. ३) मुदतवाढीचा आदेश काढला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने उमेदवारांना ‘टीईटी’साठी अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे अर्जाची मुदत ३ ऑक्टोबरऐवजी आता ९ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवारी (ता. ३) मुदतवाढीचा आदेश काढला आहे.

पूर व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथील वीजपुरवठा, इंटरनेट सुविधेला अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर टीईटीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नेट बॅंकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डवरून पेमेंट करता आले नाही. दुसरीकडे, अनेकांना टीईटीसाठी अर्जही करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अर्जासाठी व अर्जाचे शुल्क भरायला मुदतवाढ दिली आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसून, परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत होणारी २३ नोव्हेंबरची पहिली ‘टीईटी’ असणार आहे. टीईटी उत्तीर्ण नसल्यास यापुढे शिक्षकांना मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अशा पदांवर पदोन्नती मिळणार नाही, असाही निर्णय आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना (५२ वर्षांपर्यंतचे शिक्षक) टीईटी द्यावीच लागणार असल्याची सद्य:स्थिती आहे.

आणखी लाखभर अर्ज वाढतील

शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी नियोजित असून, त्या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. राज्यभरातून आतापर्यंत जवळपास तीन लाख ३६ हजार अर्ज आले आहेत. मुदतवाढीनंतर आणखी एक लाखापर्यंत अर्ज वाढतील. अर्ज करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारकच

सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार, इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची संधी देण्यात आली असून, त्यानंतर मात्र परीक्षा न देणारे व अनुत्तीर्ण शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट‌ केले आहे. पण, राज्य सरकार या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि आपल्याला त्यातून दिलासा मिळेल, अशी शिक्षकांना आशा आहे. अजून तरी तसे पाऊल उचलण्यात आले नसल्याने अनेक शिक्षकांनी २३ नोव्हेंबरच्या टीईटीसाठी अर्ज केले असून आणखी अनेकजण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INC आता IMC बनलंय, नेहरुंमुळे वंदे मातरमचे तुकडे; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर घणाघात

Kolhapur Viral Fight Video : हाण की बडीव! कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात फ्री स्टाईल हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Importance of Disconnecting After Work: कामानंतर ‘स्वतःसाठी वेळ’ का आवश्यक आहे? जाणून घ्या डिस्कनेक्ट होण्याचे फायदे

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, हीमॅनचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'मिस यू...'

Marriage Fraud : अडीच लाख घेऊन लग्न; तीन महिन्यांत ‘ती’ पसार; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT