cancer
cancer sakal
महाराष्ट्र

जगापुढे कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे

सकाळ वृत्तसेवा

सातारा : ‘‘जगभरातून उपलब्ध होत असलेल्या माहितीच्या आधारावरून २०५० पर्यंत कोरोनापेक्षाही भयंकर स्थिती कर्करोगाची असणार आहे. युरोपीय देश त्यादृष्टीने आतापासूनच कामाला लागले आहेत. युरोपीय महासंघाने ‘बिटिंग कॅन्सर’ या उद्देशाने प्रत्यक्षात पावले टाकायला सुरू केली असताना आपण अद्याप जागे झालेलो नाही. आरोग्य, पर्यावरण व शिक्षण याला सर्वोच्च प्राधान्य देऊन शासकीय धोरण ठरवायलाच हवे; अन्यथा या आजाराची येणारी त्सुनामी आपण रोखू शकणार नाही,’’ असा इशारा इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी येथे दिला.

डॉ. थोरात यांनी आज साताऱ्यात ‘सकाळच्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात संपादकीय सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. एकंदरच आरोग्य क्षेत्राचा ५० वर्षाचा आराखडा तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपचारावर मर्यादा

कर्करोगाचा आजार हा बाह्य विषाणूवर अवलंबून नाही. तो आपल्या शरीरातच असतो. जगामध्ये या आजाराच्या संशोधनाला सर्वांत जास्त निधी उपलब्ध केला जातो. तरीही जगभरातील शास्त्रज्ञ याला समजण्यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त प्रगती करू शकले नाहीत. शत्रू कोण, कसा आहे याचीच संपूर्ण माहिती समजत नाही. तो अनोळखी आहे. त्यामुळे त्याला शंभर टक्के मारण्यासाठीचे शस्त्र तयार करता आलेले नाही. तिसऱ्या व चौथ्या पातळीच्या दरम्यान आल्यावरच तो समजून येत आहे. एकदा बरा झाला तरी, दोन-चार वर्षांनी तो पुन्हा परत येतो. त्याला आपण रोखू शकत नाही. त्या पातळीवर आमचे संशोधन सुरू आहे, असे थोरात म्हणाले.

कर्करोगाची त्सुनामी

‘‘कर्करोग होण्याचे १५ टक्के कारण हे आनुवंशिक आहे. त्यानंतर बदललेली जीवनशैली, अन्नपदार्थ, विविध कारखान्यातील रासायनिक प्रक्रिया, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर ही त्याची कारणे आहेत. जगभरातील विविध देशांमधून उपलब्ध होणारा डेटा २०५० पर्यंत या आजाराच्या प्रमाणात मोठी वाढ होणार असल्याचेच दर्शवतो. त्या वेळी युरोपमध्ये दोन माणसांमागे एकाला कर्करोग होऊ शकतो. युरोपीय महासंघ आतापासूनच कामाला लागला आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

जागे व्हायलाच पाहिजे

डॉ. थोरात म्हणाले, ‘‘सर्वेक्षणानुसार युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण हे सहा व्यक्तींमागे दोन असे राहण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास देशातील सहा माणसांच्या एकत्र कुटुंबाचा विचार केल्यास प्रत्येक घरात एक मधुमेहाचा व एक कर्करोगाचा रुग्ण आढळू शकतो. उपचारातच संपूर्ण कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो.’’

डॉ. थोरात म्हणतात...

-तपासणीच्या पायाभूत सुविधा वाढविल्या पाहिजेत.

-आरोग्य क्षेत्रात वाढलेली व्यावसायिक मानसिकता बदलण्याची गरज

-वैद्यकीय क्षेत्रातील रिपोर्टिंग स्किल, रुग्णांच्या टेडा मॅनेजमेंटला महत्त्व द्यावे

-आजारांचे मॅपिंग व डेटा उपलब्ध करून त्यानुसार धोरण बनविणे आवश्यक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT