governor bhagat singh koshyari
governor bhagat singh koshyari  
महाराष्ट्र

मतदानाचा हक्क हिरावला जातोय; 12 निलंबित आमदारांचं राज्यपालांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहलंय. निलंबित असताना आमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे, असं त्यांनी या पत्रात लिहलंय. त्यांनी म्हटलंय की, मतदान करणं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. याचाच दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी दिली नसल्याचं समजतंय. यापुर्वीच १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडेही पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. याचबरोबर अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशीही केली होती विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

राज्यपाल-राज्य सरकारमधील तणाव वाढला

दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन आता पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या दोघांमधला तणाव आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कारण,अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सहा वाजेपर्यंत मंजूरी द्या, अन्यथा तुमचा प्रस्तावाला तुमचा पाठिंबा असल्याचं गृहित धरु, असं राज्य सरकारने राज्यपालांना (Governor of Maharashtra) पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलंय.

काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पत्राद्वारे दिला होता. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, छगन भुजबळ आणि बाळासाहेब थोरात राजभवनवर पोहोचले होते. या कार्यक्रमाला मागणी द्यावी, अशी मागणी भेटून करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राज्यपाल मंजूर देतील अशी अपेक्षा होती. मात्र, आज सकाळी राज्यपालांनी पत्र पाठवून ही निवडणूक घटनाबाह्य असल्याचं सांगितलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT