Ashish Shelar_Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

मग इतकी वर्षे का शांत होता? अजित पवारांचा शेलारांना सवाल

महाराष्ट्राचे आजचे प्रश्न काय आहेत ते पाहा, जुन्या मुद्यांमध्ये कोणालाही रस नाही.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सन २०१७ मध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन होणार होतं, असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतचं म्हटलं होतं. शेलारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सल्ला देतानाच उलट सवाल केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (then why was He quiet for five years Ajit Pawar question to Ashish Shelar)

पवार म्हणाले, "२०१७ सालीच ही गोष्ट सांगायची होती ना? इतकी पाच वर्षे का थांबलात? आपण आता २०२२ मध्ये आहोत. २०१७ साली असं झालं होतं हे आज तुम्ही सांगता. पण २०१७ साली आत्ताचे नेते इकडे तिकडे होते. मग त्यावेळी त्यांची विधान वेगळी होती, आत्ता वेगळी आहेत. मागच्या अशा गोष्टी काढून काहीही साध्य होणार नाही.

सध्या महाराष्ट्रातील काय प्रश्न महत्वाचे आहेत ते पहिल्यांदा बघुयात. तर २०१७ ला असं झालं, २०१२ ला तसं झालं, २०१० ला तसं झालं यामध्ये कोणाला रस नाही. आज आपल्या महत्वाच्या समस्या काय आहेत, मुलभूत प्रश्न काय आहेत यावर चर्चा झाली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

आशिष शेलारांनी कुठला मुद्दा केला होता उपस्थित?

सन २०१७ मध्येच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत अंतिम बोलणी झाली होती. त्यावेळी शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा होता पण ते कायमच खिशात राजीनामे घेऊन फिरत होते आणि टीका-टिपण्णी सुरु होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापण्याची भाजपची इच्छा होती. त्यानुसार पालकमंत्री कोण असतील हे देखील ठरलं होतं. पण नंतर भाजपचं वरिष्ठ नेतृत्वाकडून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन्याचं ठरलं. पण तेव्हा शिवसेनेसोबत आमचं जमूच शकणार नाही, असं सांगत राष्ट्रवादीनं या युतीला नकार दिला. पण नंतर २०१९ मध्ये शिवसेनेला भाजपची युती सोडावी आणि राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाण्यास काहीही वावगं वाटलं नाही. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा आपल्या भूमिका बदलतात हे भाजपला चांगलंच माहिती आहे, असं शेलार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT