महाराष्ट्र

वृक्ष लागवडीचे सरपंचांना आवाहन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने एक विशेष ग्रामसभा घेऊन गावात लावल्या जाणाऱ्या वृक्षांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करावे आणि "वृक्ष लावा- गाव वाचवा' ही संकल्पना घराघरात पोचवावी, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरपंचांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यात येत्या तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवड होणार असून यंदाच्या पावसाळ्यात होणाऱ्या वृक्षलागवडीच्या कामाच्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात पार पाडावयाच्या विविध कामांची कालमर्यादा निश्‍चित करून देताना यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.

येत्या पावसाळ्यात गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी, लोकसहभागातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे, विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करणे आवश्‍यक आहे. भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठीही मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही मुनगंटीवार यांनी सरपंचांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा मोठा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT