Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

Tripura Violence : 'जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura Violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.

त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura Violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. या हिंसाचारप्रकरणी कालपासूनच पोलिस दलाला (Police Force) सर्तक राहण्याचे आवाहन केलं असून पोलिस अधीक्षक, रेंज आयजींना अलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. संभाव्य ठिकाणी पोलिस दल दाखल झाले आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत काल मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून आज अनेक संघटनांनी प्रति मोर्चा काढायला सुरुवात केलीय. त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटना समोर आल्या असून त्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम संघटनांकडून अनेक भागांत बंद पाळण्यात येत आहे.

देसाई पुढे म्हणाले, अमरावतीत काही लोकांनी बंद पुकारलाय. मात्र, सकाळपासून पोलिस फिल्डवर तैनात करण्यात आले आहेत. जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेच्या मुळीशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्यांना आम्ही शोधून काढू, तसे आदेशही आयजींना दिले आहेत. या घटनेचा लवकरच सोक्षमोक्ष लावू. यात जे-जे कायदा हातात घेत आहेत, दगडफेक करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT