uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंच्या दंगलीच्या विधानाचा राम मंदिराच्या पुजाऱ्याकडून समाचार; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः रविवारी उद्धव ठाकरे जळगावमध्ये होते. तिथे बोलताना त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली घडतील अन् त्यावर भाजप राजकीय पोळी भाजून घेईल, असं विधान केलं होतं. त्याला अयोध्येतील पुजाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.

जळगावमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, या देशामध्ये पुन्हा गोध्रो होण्याची भीती आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून हिंदू अयोध्येत जातील. उद्घाटनानंतर माघारी येत असताना एखाद्या शहरात, किंवा वस्तीमध्ये दंगली घडवल्या जातील. जोळपोळ होईल, घरांवर हल्ले होतील आणि हे लोक राजकीय पोळी भाजून घेतील, असा आरोप ठाकरेंनी केला होता.

त्यांच्या या आरोपांना राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आचार्य दास हे 'टीव्ही ९ भारतवर्ष'शी बोलत होते. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुणी काहीच करु शकणार नाही.

आचार्य दास पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक हे भीती पसरवण्याचं काम करीत आहेत. भाजप आणि आरएसएस दंगली घडवून आणेल, असं ते म्हणत आहेत. मात्र अयोध्येत इतकी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय की, कुणी पानसुद्धा हलवू शकणार नाही.

आचार्य दास यांनी उद्धव ठाकरेंच्या जळगावमधील विधानाचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक हे तीन नेते दंगल भडकवतील, अशी भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. मात्र सुरक्षा व्यवस्था तैनात आहे सगळं व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास दास यांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

Jayakwadi dam drowning incident: जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन-साई यांची विकेट अन् वैभव सूर्यवंशीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड... अहमदाबादमध्ये नोंदवला भन्नाट विक्रम

Vat Purnima 2026: अधिक मासामुळे वटपौर्णिमा उशिरा; जाणून घ्या योग्य तारिख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

SCROLL FOR NEXT