Uddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statement Uddhav Thackeray comment on Bhagat Singh Koshyaris statement
महाराष्ट्र बातम्या

‘मुंबईचं वैभव गिळायचं आहे, हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य अंधेरी पश्चिम येथील कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यामुळे सकाळपासून वाद पाहायला मिळत आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत बसले असले तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे, असे ते म्हणाले. याचे कारण म्हणजे पैसा. हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघडपणे सांगितले आहे. अनवधानाने का होईना त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला आहे. त्यांना मुंबईचे वैभव व पैसा गिळायचं आहे. हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

आजच्या पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निमित्याने त्यांनी शिंदे गट व भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. दिल्लीत बसले असले तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे, असे म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. केंद्र सरकारचे लक्ष मुंबई व महापालिकेवर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या बोलण्यातून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT