Thackeray Group 
महाराष्ट्र बातम्या

Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या आधीच झाली ठाकरेंच्या खास माणसाची चौकशी; वाचा काय आहे प्रकरण ?

सकाळ डिजिटल टीम

Dasra Melava: उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. जोगेश्वरी पालिका भूखंड आणि पंचतारांकित हॉटेलचा समावेश असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी वायकर यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार वायकर सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले.

वायकर यांनी फसवणूक करून मुंबई महापालिकेकडून बागेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाची मंजुरी मिळवल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे त्यांनी पालिकेचे नुकसान केल्याचाही आरोप आहे.

संबंधित प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच पालिकेच्या उद्यान आणि इमारत प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने हॉटेलला बेकायदा मान्यता दिल्याचा आरोप आहे.

वायकर यांनी यापूर्वी सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले होते. आपल्याकडे भूखंडाची सर्व कायदेशीर कागदपत्रे असून कोणत्याही नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

यंदाच्या वर्षी मार्चमध्ये किरीट सोमय्या यांनी कथित घोटाळ्याबद्दल आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशीसाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

Maratha Reservation: मृत आंदोलकांच्या वारसांना मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनाची पूर्तता; एमआयडीसीत नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

देशातील ३२ हजार टन सोन्यावर मोदी सरकारची नजर; १ टक्के जरी बाजारात आलं तरी टेन्शन मिटणार, नेमकी काय आहे योजना?

सासर असावं तर असं! सुनेची मालिका पाहण्यासाठी लावली थेट मोठी स्क्रीन, प्राजक्ता गायकवाड पोस्ट करत म्हणाली...

Mumbai News: मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य! रस्ते काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम, तीन दशकांत ६० टक्के जमीन सिमेंटखाली

SCROLL FOR NEXT