Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरणाचे रेकॉर्ड! यंदा उजनीतून १०० दिवसांत वाहून गेले २१० TMC पाणी; पावसाच्या पाण्यावर तयार झाली यंदा ९.१३ कोटींची वीज; दररोज ३ लाख युनिट निर्मिती

उजनीतून २० जूनपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली असून अजूनही ते सुरू आहे. सध्या १६०० क्युसेकचा विसर्ग धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडला जात आहे. त्यातून दररोज तीन लाख युनिट, अशी १०० दिवसांत तब्बल सव्वातीन कोटी युनिट वीज निर्मिती झाली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनीतून २० जूनपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली असून अजूनही ते सुरू आहे. सध्या १६०० क्युसेकचा विसर्ग धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडला जात आहे. त्यातून दररोज तीन लाख युनिट, अशी १०० दिवसांत तब्बल सव्वातीन कोटी युनिट वीज निर्मिती झाली आहे. ‘महावितरण’कडून प्रतियुनिट २.८० रुपयांना ही वीज विकत घेतली जाते. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पाने नऊ ते साडेनऊ कोटी रुपयांची वीज तयार केली आहे.

उजनी धरणावर १२ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे, जो सिंचन पंप विद्युतीकरण आणि वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभारला आहे. त्याठिकाणी यंदा सलग १०० दिवस वीजनिर्मिती झाली आहे. दरम्यान, सोलापूर शहराला पिण्यासाठी दरवर्षी अंदाजे तीन टीएमसी पाणी लागते. तर शेतीसाठी साधारणत: २० टीएमसी सोडले जाते. धरणातील ८४ टीएमसी पाण्याचे वाटप निश्चित झाले असून त्यातून पाणीपुरवठा योजना, शेती, एमआयडीसी, साखर कारखाने व उपसा सिंचन योजनांना पाणी दिले जाते. यंदा पावसाळ्यात मेअखेर प्लसमध्ये आलेले उजनी जूनमध्येच पूर्ण क्षमतेने भरले.

धरणात पाण्याची आवक वाढल्याने पूर नियंत्रणासाठी २० जूनपासून भीमा नदीतून पाणी सोडायला सुरवात झाली. त्याचवेळी धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठीही पाणी मिळाले. सोलापूर शहराची ७० वर्षे तहान भागेल इतके पाणी यंदा भीमा नदीद्वारे वाहून गेले. अजूनही पाणी सोडणे सुरूच असून, ऐन पावसाळ्यात उजनीचे पाणी कालव्यातूनही सोडले. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी बंद करा, अशी मागणी करावी लागली.

२० वर्षांनंतर उजनीतून सोडले २१० टीएमसी पाणी

सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांना आधार असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत आहे. २००५ मध्ये पुणे-सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनीतून तब्बल ३५३ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले होते. त्यानंतर यंदा २०२५ मध्ये आतापर्यंत उजनीतून २१० टीएमसी पाणी सोडण्यात आले असून अजूनही ते पाणी सुरूच आहे. आता उजनीत १२० टीएमसी पाणी असून यंदाच्या उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी पाणी टंचाई जाणवणार नाही, हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

Degloor Crime News : सीमेवरील हणेगावात ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; साडेसात लाखाचा मुद्देमाल ताब्यात..

Terakhda News : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फटाका कारखान्यात स्फोट; मोठी आग,जीवितहानी टळली.

SCROLL FOR NEXT