ujani dam solapur
महाराष्ट्र बातम्या

उजनीचे पाणी पसरले 164 किलोमीटरपर्यंत! शेतकऱ्यांना यंदा उन्हाळ्यात 3 आवर्तने; 15 ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीची बैठक; पावसाळ्यात उजनीतून सोडले 108.55 TMC पाणी

उजनी धरणात सध्या १२२.७२ टीएमसी पाणी असून ते पाणी १६४ किलोमीटर दूरवर पसरले आहे. धरणाची मूळ रुंदी दोन किमी आहे, पण कालठणजवळ आठ किमी तर वांगी, कळाशी, कुगावजवळ नऊ किलोमीटर रुंदी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतकऱ्यांना उन्हाळ्यात तीन आवर्तने सोडली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात सध्या १२२.७२ टीएमसी पाणी असून ते पाणी १६४ किलोमीटर दूरवर पसरले आहे. धरणाची मूळ रुंदी दोन किमी आहे, पण कालठणजवळ आठ किमी तर वांगी, कळाशी, कुगावजवळ नऊ किलोमीटर रुंदी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतकऱ्यांना उन्हाळ्यात तीन आवर्तने सोडली जाणार असून १५ ऑक्टोबरनंतर त्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन होईल.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांमध्ये उजनी धरण ११०.२५ टक्के भरल्याने आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी धरण केवळ ६४ टक्केच भरले होते आणि उन्हाळ्यात आजवरील सर्वात निच्चांकी पातळी (उणे ६० टक्के) गाठली होती. यावर्षी उजनी धरण ऑगस्टमध्येच भरल्याने धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीतून पाणी सोडावे लागले.

आगामी उन्हाळा संपेपर्यंत धरण प्लसमध्येच राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीसह ४२ योजनांसाठी उजनीतून पाणी सोडले जाते. त्यात जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत-जामखेड सारख्या मोठ्या पाणीपुरवठा योजना उजनीवर अवलंबून आहेत.

पूरनियंत्रणासाठी सोडले १०८.५५ टीएमसी पाणी

उजनी धरण सध्या ११०.२५ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणात अजून अर्धा टीएमसी पाणी मावते. अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने तेवढी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे बंद केले असून सध्या धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी सांडव्यातून १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान, ४ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर (१७ ते २२ सप्टेंबर वगळून) या काळात एकूण ६२ दिवस धरणातून पूरनियंत्रणासाठी भीमा नदीतून तब्बल १०८.५५ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर

उजनी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने उन्हाळ्यात कोणतीही अडचण येणार नाही. १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यावेळी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली धरणातील पाण्याचे नियोजन होईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT