महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढणाऱ्या 'वंचित'च्या उमेदवाराला धमकी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला वरळी मतदारसंघ प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही चर्चेत आला. दोन कोटी रुपये घेऊन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे वरळी मतदारसंघातील उमेदवार गौतम गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी वरळी पोलिसांत तक्रार दिली आहे. 

गायकवाड हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी एकाने शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत गौतम गायकवाड यांची भेट घेतली आणि दोन कोटी रुपये घेऊन निवडणुकीतून माघार घेण्यास धमकावले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी त्याच व्यक्तीने गायकवाड यांना फोन करून दादरमध्ये या आणि दोन कोटी रुपये घेऊन माघार घ्या, अशी धमकी दिली. याबाबत वरळी पोलिस ठाणे, मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांना धमकावणाऱ्यास पोलिसांनी बोलावून चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी उमेदवाराला धमकावण्यात आल्याचा आम्ही निषेध करतो. "वंचित'च्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या पायांखालची वाळू सरकली आहे. मतदारांनाही भयभीत करण्याचा हा डाव आहे. तरी निवडणूक आयोगाने यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय: अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक वर्ष

Money Vastu Tips : खिशात एक रुपयाही टिकत नाही ? वास्तूचे हे उपाय करा आणि पैशांची होईल भरभराट

Indapur Crime: कळंबमध्ये १०० किलो गांजा जप्त; गांजा तस्करी करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई!

मी आणि अक्षर कोठारी लग्न करणार आहोत... त्या अफवेवर रेश्मा शिंदेने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'आम्हा दोघांना कळलं तेव्हा...

SCROLL FOR NEXT