vedanta foxconn project uday samant on eknath shinde phone call pm narendra modi
vedanta foxconn project uday samant on eknath shinde phone call pm narendra modi  
महाराष्ट्र

मोदींकडून शिंदेंना मोठ्या प्रोजेक्टचं गाजर? विरोधकांची वेदांतावरून टीका

सकाळ डिजिटल टीम

Vedanta Foxconn Project : सध्या राज्यातील राजकीय वातावरण वेदांता-फॉक्सकॉन कंपनीनेचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर या मुद्द्याबाबत विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधला. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे

उदय सामंत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मागच्या सात-आठ महिन्यांत हवा असलेला प्रतिसाद उद्योजकाला न मिळ्याल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. पण महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी आश्वासन दिलं की एवढाच किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प काही दिवसांतच महाराष्ट्राला बेरोजगीरी दूर करण्यासाठी दिला जाईल असे उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचं शिंदे सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी यापेक्षा मोठा प्रकल्प केंद्र सरकार काय देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिवाय औद्योगिक प्रकल्प उद्योजकांकडून मिळतो, मग तो केंद्र सरकार कसा देणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे आश्वासन महाराष्ट्रासाठी केवळ गाजर तर नव्हे ना, असा प्रश्न विरोधकांसह जनतेला पडला आहे.

प्रकल्प राज्याबाहेर का गेला?

एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील असे सांगण्यात आले होते.

तसेच, तळेगावजवळील ११०० एकर जमीनही देण्यात आली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT