Prataprao Gujar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prataprao Gujar : 'वेडात मराठे वीर दौडले सात', आजच्याच दिवशी झाला होता नेसरीचा रणसंग्राम...

म्यानातुनि उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !

सकाळ डिजिटल टीम

Prataprao Gujar : महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्यासाठीची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसांत भिनली होती. या शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण नी कण देतो. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. 

म्यानातुनि उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्राजांनी लिहीलेलं आणि लता मंगेशकर यांनी लिहिलेलं हे गाणं नुसतं गाणं ऐकलं तरी अंगात वेगळीच एनर्जी संचारल्या सारखं वाटतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.

प्रतापरावांचा पराक्रम...
प्रतापरावांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्‍यातील ताम्हाणे उर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी; शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्‌दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना "प्रतापराव" किताब देवून गौरवण्यात आले होते.

नेसरीचा रणसंग्राम...
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा स्वराज्यात धूमाकूळ घालू लागला होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच "बेहेलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका" अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला.

खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने प्रतापराव गुर्जर संधी शोधत होते. एकेदिवसी ते आपल्या सहा सरदारांसोबत फेरफटका मारायला निघाले असताना बहलोल खान जवळच असल्याचे त्यांना समजले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा होता.

तेव्हा त्यांनी सैन्याची वाट न पाहता सहा सरदारांसोबत बहलोल खानाच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्यासोबत सरदार विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला, मात्र सातही जणांना वीर मरण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT