Nawab Malik 
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादी पर्यायी सरकार बनविण्यास तयार, काँग्रेसच्या निर्णयाची वाट : मलिक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्याय निर्माण होऊ शकत नाही. आमचा पक्ष पर्यायी सरकार बनविण्यास तयार आहोत. शिवसेनेशी आमची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आज दुपारी चार वाजता काँग्रेसची बैठक पुन्हा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ठरविले आहे, की काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही. आम्ही आघाडीत निवडणूक लढविल्याने आम्ही एकत्र निर्णय घेणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. चार वाजता होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व स्पष्ट होणार आहे.

मलिक म्हणाले, की पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. भाजपने नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली होती. काँग्रेसला विचारूनच आम्ही निर्णय घेऊ. आम्ही दोन तास बैठकीत चर्चा केली. शरद पवार आज दिल्लीला जाणार नाही. ते मुंबईतच असणार आहे. शिवसेना नेत्यांशी आमची यापूर्वीही चर्चा सुरु होती आणि पुढेही सुरु राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT