weather update Very adverse weather warning for citizens will given on TV radio sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : टीव्ही, रेडिओवरूनही मिळणार हवामानाचा इशारा; ‘एनडीएम’चा उपक्रम; नागरिकांना सावध करणार

देशातील नागरिकांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा इशारा लवकरच टीव्ही तसेच रेडिओवरूनही देण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा इशारा लवकरच टीव्ही तसेच रेडिओवरूनही देण्यात येणार आहे. टीव्हीच्या पडद्यावर हा इशारावजा संदेश झळकेल. रेडिओवरील कार्यक्रम मध्येच थांबवून हवामानाचा इशारा दिला जाईल.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) नुकतेच मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह कोसळणारा पाऊस आणि उष्णतेच्या लाटा आदींबद्दलची महत्त्वाची माहिती मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, आता पुढील पाऊल टाकत टीव्ही, रेडिओ आणि इतर माध्यमांवरून नागरिकांना खराब हवामानाबद्दलची माहिती पाठवून त्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला जाईल.

‘एनडीएमए’च्या अधिकाऱ्याने सांगितले, की मोबाईलवरून नागरिकांना हवामानाच्या इशाऱ्याचे मेसेज पाठविणे हा पहिल्या टप्प्याचा भाग आहे. दुसऱ्या टप्प्यात टीव्ही, रेडिओ व इतर माध्यमांवरून नागरिकांना हवामानाचा इशारा पाठविला जाईल.

येत्या वर्षाच्या अखेरीस त्याची अंमलबजावणी होईल. तंत्रज्ञान व दळणवळणाच्या एकत्रीकरणामुळे मजकुरावर आधारित मर्यादा ओलांडण्याचे एनडीएमएचे उद्दिष्ट आहे. मोबाईलवर संदेश पाठविण्यापूर्वी ‘एनडीएमए’कडून नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टलच्या माध्यमातून आणि ‘सचेत’ नावाच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सावधगिरीचा इशारा दिला जात असे.

एनडीएमएने हवामान खात्यासह, केंद्रीय जल आयोग, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र आणि भारतीय वन सर्वेक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आदी हवामानाचा इशारा जारी करणाऱ्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने एकात्मिक इशारा यंत्रणेची संकल्पना मांडली होती.

या प्रकल्पाची पहिल्या टप्प्यात २०२१ मध्ये तमिळनाडूत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केल्यानंतर केंद्राने तो संपूर्ण देशात राबविण्यास संमती दिली होती. हा अशा प्रकारचा हवामानाचा इशारा देण्याचा जगातील सर्वांत मोठा उपक्रम आहे. त्यासाठी, लोकांना व्हाट्‌स ॲप, ई-मेल किंवा एसएमएस ग्रुपचे सदस्यत्व घेण्याची गरज नाही. त्यांना हवामानाचा इशारा आपोआप मिळेल, असेही एनडीएमएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, असा इशारा मिळाल्यानंतर मोबाईलही व्हायब्रेट होईल. हे खूप कमी वेळात केले जाईल.

देशात ५० वर्षांत ५७३ आपत्ती

जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार १९७० ते २०२१ या ५० वर्षांच्या काळात भारताला हवामानाशी संबंधित सुमारे ५७३ आपत्तींचा सामना करावा लागला. या आपत्तींमध्ये १ लाख ३८ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, २०२२ मध्ये अशा आपत्तींमुळे २,७७० जणांना प्राण गमवावे लागले.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

  • वामानाची सामान्य इशारा यंत्रणा उभारणारा भारत उत्तर गोलार्धाबाहेरचा एकमेव देश

  • मोबाईलवर इशाऱ्याचा मेसेजसाठी व्हॉट्‌स ॲप ग्रुपची गरज नाही

  • लोकांना स्थानिक भाषेसह दोन भाषांत हवामानाचा इशारा मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT