Tatya Tope Birth Anniversary esakal
महाराष्ट्र बातम्या

Tatya Tope Jayanti : स्वातंत्र्याची लढाई जीवंत ठेवणारे तात्या टोपे नेमके कोण होते?

तात्या चार वर्षांचे असताना त्यांचे वडील दुसरे बाजीराव पेशवे यांच्यासोबत बिठूर येथे स्थायिक झाले...

सकाळ डिजिटल टीम

Tatya Tope Birth Anniversary : थोर सेनानी तात्या टोपे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८१४ मध्ये महाराष्ट्रातील पाटोदा जिल्ह्यातील येवला गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग येवलकर होते. त्यांचे वडिल पांडुरंग हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारी कार्यरत होते तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. यानंतर त्यांना ‘टोपे’ असे टोपणनाव मिळाले.

लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांच्यासोबत गेले बालपण

तात्यांचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी पुण्यात येऊन राहिले. तात्या चार वर्षांचे असताना त्यांचे वडील दुसरे बाजीराव पेशवे यांच्यासोबत बिठूर येथे स्थायिक झाले. पर्यायाने तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले.

अन् येवलकर ‘टोपे’ झाले

रामचंद्र पांडुरंग यांना तात्या म्हणून संबोधले जायचे, ते शूर आणि बौद्धिकदृष्ट्याही खूप बलवान होते. तात्या कोणतेही काम मोठ्या कष्टाने आणि चिकाटीने पूर्ण करायचे. दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्या या समर्पणावर खूप आनंदी होते म्हणूनच त्यांना बिठूर किल्ल्याचा कारकून करण्यात आले. हे कामही त्यांनी चोख बजावले. यावर आनंदी होऊन पेशव्यांनी त्यांना एक रत्नजडित टोपी बक्षीस म्हणून दिली. यानंतर रामचंद्र पांडुरंग यांना तात्या टोपे म्हटले जाऊ लागले.

नाना साहेबांनी केले सेनापती

पेशवा बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांनी तात्या टोपे यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली. हा तो काळ होता जेव्हा इंग्रजांनी नानारावांना पेशवे पद देण्यास नकार दिला आणि दुसरे बाजीराव पेशवे यांना दिलेली पेन्शनही नाकारली. त्यामुळे नानासाहेब संतापले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची तयारी केली. रणनीती तयार करण्याची जबाबदारी तात्या टोपे यांच्यावर होती.

शिवपुरीच्या पाडळ जंगलात झोपलेले तात्या टोपेंनी अटक केली

ग्वाल्हेरमध्ये राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतरही तात्या टोपे यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवला अनेक छोटे-छोटे हल्ले करुन तात्यांंनी इंग्रजांचे मोठे नुकसान केले. त्यांना जेरबंद करण्यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. अखेर नरवारच्या राजाने तात्या टोपे यांचा विश्वासघात केला आणि शिवपुरीच्या पाडळ जंगलात झोपलेले असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि १५ एप्रिल १८५९ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT