BJP party without ethics nana patole Dhananjay Munde Renuka Devi politics sakal media
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

सर्वकाही व्यवस्थित असताना अचानकपणे दंगली घडल्याच कशा?

सकाळ डिजिटल टीम

राज्यात औरंगाबाद, नगर, अकोला, त्र्यंबकेश्वर (नाशिक) व इतर अशा नऊ ठिकाणी काही दिवसांत जातीय दंगली घडल्या आहेत. सर्वकाही व्यवस्थित असताना अचानकपणे दंगली घडल्याच कशा?, त्यामागे नेमका सूत्रधार कोण आहे?, पोलिस दबावाखाली काम का करीत आहेत?, असे अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे सरकारला विचारले.

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी भाजपवर टीका केली.

याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नसिम खान, आमदार भाई जगताप, प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, रामहरी रूपनवर, विश्वनाथ चाकोते, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी वाढल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच दंगली: चव्हाण

देशात नोटाबंदी करताना दोन हजाराची नोट असावी, अशी कोणाचीही मागणी नसतानाही त्या नोटा आणल्या. आता पुन्हा त्या बंद केल्या जात आहेत. पण, सुरवातीला त्या आणल्याच कशाला, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सरकारला विचारला.

तर अर्थव्यवस्था अजूनही भरकटलेलीच असून देशावरील कर्जाचा डोंगर खूपच वाढला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे म्हणूनच राज्यात दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप श्री. चव्हाण यांनी केला आहे.

शिंदे अन्‌ थोरात म्हणाले...

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यावेळी जनता दलाने खूप त्रास दिला. पण, कर्नाटकातून त्या विजयी झाल्या आणि पुन्हा त्यांनी देशाचे नेतृत्व त्यांनी केले. आता कर्नाटक निकालानंतर भाजप गल्लीबोळात देखील दिसणार नाही, अशी जनभावना असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

तर उत्तर प्रदेशात पैलवान मुली न्यायासाठी आंदोलन करीत आहेत, पण दुसरीकडे ब्रिजभूषणच्या समर्थनार्थ भाजप रॅली काढत आहे. आगामी १६ महिने निवडणुकीचे असून कर्नाटकप्रमाणे राज्यातील जनेतेने भाजपचा खोटारडा चेहरा ओळखायला हवा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

SCROLL FOR NEXT