Bharat Jodo Yatra Maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवणार का? 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून त्यांनी नुकतंच सावरकरांविरोधात विधान केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या महाराष्ट्रात असलेल्या 'भारत जोडो यात्रे'त सावरकरांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रातच थांबवा अशी मागणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. (Will Bharat Jodo Yatra stop in Maharashtra Rahul Shevale complaint to CM Eknath Shinde)

शेवाळे म्हणाले, "राहुल गांधींनी सावरकरांविरोधात विधान केल्यानं मी आज या व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की, या विधानाची गंभीर दखल घेऊन 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात थांबवावी. राज्यात कायद्याचं राज्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं राज्य आहे, हे दाखवून द्यावं"

"तसेच सर्व शिवसैनिकांनाही मी आवाहन करतो की, जसं बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात 'जोडे मारो' आंदोलन केलं होतं. त्याप्रमाणं त्यांनीही राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करावं" असं आवाहनही त्यांनी केलं.

भारत जोडो यात्रा थांबवणं अशक्य - काँग्रेस

दरम्यान, राहुल गांधी एक अशी व्यक्ती आहेत ज्याच्या कुटुंबानं आणि त्यांनी स्वतः या देशाला सर्वस्व या देशाला अर्पण करतो आहे. ही व्यक्ती देशावर खूपच प्रेम करतो, त्याला थांबवण्याचा अधिकार कोणालाच नाही. संविधानानं दिलेला हा अधिकार आहे, हे अन्यायकारी सरकार आहे. चांगल्याच्या समर्थनात ही यात्रा आहे. इतिहासाची मोडतोड करणं, गद्दारांसारखं वागणाऱ्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी हे अतिशय निरागसपणे लोकांचं ऐकून घेत आहेत. त्यामुळं त्यांना कोण थांबवणारं, शेवटी ही यात्रा जम्मूमध्ये जाऊनच थांबेल, असंही यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी संस्थाचा मोठा निर्णय; मंदिर २४ तास भक्तांसाठी खुलं राहणार!

SCROLL FOR NEXT