Students_Admission 
महाराष्ट्र बातम्या

अकरावी अॅडमिशन : यंदा कटऑफ वाढणार; आवडत्या कॉलेजसाठी विद्यार्थ्यांमध्ये रंगणार चुरस!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता १०वीचा निकालाचा आणि गुणांचा टक्का चांगलाच वाढल्याने विद्यार्थांना आता ११वी प्रवेशासाठी आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. निकाल चांगला लागला असल्याने यंदाचा कट ऑफ देखील २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला, तर पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला. यामुळे पुणे शहरात प्रवेशासाठी जोरदार स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी पुणे विभागाचा निकाल ८२.४८ टक्के एवढा लागला होता.

यंदा पुणे जिल्ह्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजार ६६८ इतकी आहे. त्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किमान १५ हजार आहे. 

गेल्या वर्षी ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण घेणारे सुमारे ५ हजार विद्यार्थी होते. यंदा ही संख्या तिप्पट झाल्याने पुण्यातील नामांकित महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांचा कट ऑफ किमान २ ते ५ टक्के वाढेल अशी शक्यता आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांनीही त्याचा अर्ज भरताना महाविद्यालयाचा पसंती क्रमांक व्यवस्थीत द्यावा लागणार आहे. 

"राज्यातील टाॅपर विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेतात, पण यंदा कोरोना मुळे कितीजण पुण्यात येतील हे पहावे लागणार आहे. निकाल चांगला लागल्याने कटऑफ वाढेल. ज्या महाविद्यालयात जागा कमी आहेत तेथे  कटऑफ जास्त प्रमाणात वाढेल."
- डाॅ. दिलीप सेठ, प्राचार्य, स. प. महाविद्यालय

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT