Ajinkya Raut's Instagram account hacked
Ajinkya Raut's Instagram account hacked esakal
मनोरंजन

'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं इस्टा अकाऊंट हॅक

धनश्री ओतारी

'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत त्याच्या हटके अंदाजामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र डॅशिंग अजिंक्यची फसवणूक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली असून यामुळे त्याला त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे.

अजिंक्यने त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. "माझं @ajinkyathoughts हे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं सांगताना मला खुप वाईट वाटतंय. मला इंस्टाग्रामवर मॅसेज बॉक्स मध्ये 'Meta blue badge' असा मॅसेज आला. या मॅसेज मधून मला एक फॉर्म भरण्यासाठी सांगितलं गेलं. हा फॉर्म खूपच प्रामाणिक दिसत असल्याने मी तो भरण्यासाठी त्यावर गेलो, तर त्यावेळी मी माझ्या इन्स्टाग्रामवरून अचानक लॉगआऊट झालो" असं त्याने फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

तसेच, आणखी एक पोस्ट शेअर करत, "हे सगळं खूप भयानक आहे. माझे १ लाख चौऱ्याहत्तर हजार फॉलोअर्स होते आणि आता ते अकाउंट हॅक झालंय. मी ते अकाउंट रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण मला वाटतं ते अकाउंट बंद झालं आहे" असं अजिंक्यने त्याच्या दुसऱ्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे अजिंक्य तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबतची जोडी खुपच हिट ठरत आहे. या मालिकेतील जोडीचे अनेक रील्स इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT