Bhagyashree, Himalay Dassani  Google
मनोरंजन

'मैेने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या मनात का आहे मीडियाविषयी राग?

'मैने प्यार किया' सिनेमानंतर भाग्यश्रीनं हिमालय दासानीसोबत लग्नगाठ बांधली होती.

प्रणाली मोरे

'मैने प्यार किया'(Maine Pyar Kiya) सिनेमानं एक काळ गाजवला होता. सलमान(Salman Khan)-भाग्यश्रीनं(Bhagyashree) रंगवलेली 'प्रेम-सुमन' ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली होती. या सिनेमाच्या कथानकापासून ते गाण्यांपर्यंत सारंच मोहवणारं. यात आपल्या पहिल्याच सिनेमातून भाग्यश्रीनं सर्वांचीच मनं जिकंली होती. तिचं दिसणं,तिचं हसणं,तिचं बोलणं,चालणं इतकंच काय तिच्या रडण्यावरही म्हणे त्यावेळी लोकं फिदा झाली होती. पण त्या सिनेमानंतर भाग्यश्री फार सिनेमात दिसली नाही. कारण होतं तिच्यासोबतच एक-दोन सिनेमातनं दिसलेल्या हिमालय दासानी सोबतचं तिचं अफेअर आणि त्यानंतर लग्न करुन सुरू झालेला संसार. पण म्हणे ही लव्हस्टोरी काही साधी-सरळ नव्हती. यात बरेच 'ट्वीस्ट अॅन्ड टर्न्स' आलेय. स्वतः भाग्यश्रीनंच 'स्मार्ट जोडी' या शो मध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री लवकच आपल्याला स्टार प्लसवरील 'स्मार्ट जोडी' या शे मध्ये नवरा हिमालय दासानीसोबत दिसणार आहे. या शो मध्ये त्या दोघांनी पुन्हा आपल्या लग्नाच्या दिवसाचा सोहळा अनुभवला आहे. म्हणजेच त्यांचं लग्न लागलेलं आपण पाहणार आहोत. भाग्यश्रीनं हिमालय दासानीसोबत १९९० साली लग्न केलं ते ही आपल्या पालकांच्या निर्णयाविरोधात बंड पुकारून बरं का. आपल्या लग्नावेळच्या त्या आठवणींना उजाळा देताना भाग्यश्री म्हणाली,''माझ्या घरातनं लग्नाला परवानगी नव्हती. माझ्याकडून आमच्या लग्नाला कोणच उपस्थित नव्हतं. अर्थात आई-वडील आपल्या मुलांसाठी चांगलीच स्वप्न पाहतात,तशी त्यांनीही पाहिली होती. पण मुलांची देखील आपली स्वप्न असू शकतात जी त्यांना जगू द्यायला हवीत. त्यासाठी आईवडिलांनी सपोर्ट करायला हवा. मी आजही सांगेन की मी पळून जाऊन लग्न केलं नव्हतं. मी रितसर आई-वडिलांना विचारलं त्यांनी नकार दिला मग आम्ही आमचा निर्णय घेत लग्न केलं. पण याला पळून जाऊन लग्न केलं असं म्हणता येणार नाही. कारण मी लग्न करतेय हे माझ्या घरी माहित होतं. जेव्हा उगाच काही लोकं आणि मीडिया त्यावेळी म्हणाले होते की मी पळून जाऊन लग्न केलं,तेव्हा मला त्या गोष्टीचा खूप राग आला होता. आणि आजही येतो''.

भाग्यश्री आणि हिमालय यांना दोन मुलं आहे,मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका. त्या दोघांनीही सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. भाग्यश्रीनं याच स्मार्ट जोडी शो मध्ये खुलासा केला होता की,'' लग्नाच्या ३२ वर्षानंतर आमच्या नात्यात दुरावा आला होता. आणि आम्ही वेगळे झालो होतो,ते देखील १ वर्षासाठी''. असो,आता सारं आलबेल आहे. दोघंही मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत आपला संसार. सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या फोटो-व्हिडीओमधून तो अंदाज येतोच आपल्याला. तेव्हा स्मार्ट जोडी शो मध्ये भाग्यश्री-हिमालयाचं लग्न पाहणं प्रेक्षकांसाठी आनंदाचा क्षण ठरेल हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT