Boycott Bollywood news  esakal
मनोरंजन

Boycott Bollywood: 'आता बस्स, खूप झालं! नाहीतर...' अर्जुन कपूरचा संताप

'बॉयकॉट म्हणणाऱ्यांना अद्दल घडवावीच लागेल, अति होतंय' - मलायकाचा अर्जुन चिडला

युगंधर ताजणे

Boycott Bollywood : बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका अशी जोरदार मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामध्ये (Bollywood Arujun Kapoor) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. यानंतर बॉलीवूडच्या चित्रपटांवरच बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेटकऱ्यांकडून होत असताना आता त्यावर बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी (Boycott Laal Singh Chaddha) सावध झाले आहेत. त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून जी लोकं ट्रोलिंग आणि बहिष्काराची मागणी करत आहे त्यांना अद्दल घडवावी लागेल. अशी प्रतिक्रिया बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं दिली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर नेटकरी काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अर्जुननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची नेटकऱ्यांची जी भूमिका आहे ती एक वाईट सवय होताना दिसत आहे. हा सगळा काय प्रकार आहे हे काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता जे काही होतं आहे ते अति आहे. नेटकऱ्यांनी वेळीच हा प्रकार थांबवावा. जे कुणी असा प्रकार करत आहेत त्यांना चांगलीच अद्दल घडवावी लागेल. असेही अर्जुननं यावेळी म्हटले आहे. 2012 मध्ये परिणीती चोप्रा सोबत इश्कजादे मधून अर्जुननं बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. त्याच्या वाट्याला फारसं यश आले नसले तरी चाहत्यांनी त्याची दखल ही बऱ्याचदा मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे घेतल्याचे बोलले जाते.

नुकताच त्याचा एक व्हिलन रिटर्न्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया, दिशा पटानी, जॉन अब्राहम यांनी काम केले. यामध्ये अर्जुननं गौतम मेहराची भूमिका केली होती. अर्जुननं बॉलीवू़ड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की, मला वाटतं आम्ही शांत बसतो म्हणजे आम्हाला राग येत नाही असे समजू नका. बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार हा काय प्रकार सुरु आहे हे कळायला मार्ग नाही. आमचा मोठेपणा आम्ही शांत बसतो नाहीतर आम्हाला नेटकऱ्यांना अद्दल घडवावी लागेल. अशी भूमिका अर्जुननं घेतली आहे. नेटकऱ्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

आम्ही दरवेळी असा विचार केला की, लोकांना आमचे काम आवडले नाही म्हणून ते आम्हाला अव्हेरत असतील. किंवा त्यांना आमचे चित्रपट पाहावेसे वाटत नसतील. मात्र आता तसे कारण काही दिसत नाही. ते वेगळ्या पद्धतीनं विचार करत आहे. काही कलाकृती चांगल्या असूनही त्यांनी त्या पाहण्याच्या ऐवजी त्याच्यावर टीका केली आहे. म्हणून मला असे वाटते की, आम्ही खूप सहन केले आहे. नेटकरी अति करत आहेत. जे काही होतं आहे ते चुकीचे आहे असेही अर्जुननं सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT