zee marathi serials  
मनोरंजन

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

सकाळ ऑनलाइन

उत्तम कथानक, त्यातील कलाकारांचं दमदार अभिनय आणि कथेतील रंजक वळण या गोष्टींमुळे एखादी मालिका लोकप्रिय ठरते. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मग त्यातील काही कलाकार बदलले तरी त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी होत नाही. मात्र आता झी मराठी वाहिनीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आहे 'माझ्या नवऱ्याची बायको'.

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं, असं म्हणत जवळपास चार वर्षांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजवर या मालिकेने टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. मात्र आता ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. येत्या ७ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी 'घेतला वसा टाकू नको' ही नवी मालिका सुरू होणार आहे. 

झी मराठी वाहिनीवर आणखी एक लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा तिसरा भाग लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित झाला असून त्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT