Kantara's Rishab Shetty weighs in on why Bollywood is losing its touch; says there is 'too much western influence'
Kantara's Rishab Shetty weighs in on why Bollywood is losing its touch; says there is 'too much western influence' sakal
मनोरंजन

Rishab Shetty: बॉलीवूड चित्रपट का होतायत फ्लॉप? कांतारा फेम ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला..

सकाळ डिजिटल टीम

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. केजीएफ नंतर, कांतारा या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आपल्याकडे खेचले आहे. ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ऋषभ शेट्टी त्याच्या कांतारा या चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवत आहे. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्याने बॉलीवुडच्या अपयशाबाबत भाष्य केले आहे.

ऋषभने नुकतेच मीडियाला सांगितले होते की, त्याला कांतारा चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात अजिबात रस नाही, कारण त्याने या चित्रपटाचा हिंदी डब आधीच रिलीज केला आहे. तर दुसरीकडे ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा बॉलिवूडबाबत असे वक्तव्य केले ज्याची भलतीच चर्चा होत आहे.

ऋषभ शेट्टीने बॉलिवूडबद्दल म्हटले आहे की, सध्या बॉलिवूडमध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभाव जास्त होत आहे बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा जास्त वापर होत आहे, स्वतःची अशी कथा नाही त्यामुळे बॉलिवूड कुठेतरी मागे पडत आहे.

ऋषभ शेट्टी म्हणाला की, 'आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, स्वतःसाठी नाही. तर प्रेक्षकांसाठी काय योग्य आहे आणि प्रेक्षकांची आवड आपण समजली पाहिजे,कारण आधी मी पण एक प्रेक्षक होतो आता मी चित्रपट निर्माता आहे पण मला प्रेक्षकांची आवड समजुन घेणे महत्त्वाचे आहे

ऋषभ पुढे म्हणाला, 'पण आता खूप पाश्चिमात्य आणि हॉलीवूड संस्कृतीचे चित्रपट निर्माते भारतात आणयाचा प्रयत्न करत आहेत. पण मला समजत नाही की बॉलीवूडमध्ये असा का करत आहेत? हॉलीवूडमध्ये लोक आधीच ते लागू करत आहेत आणि जनताही ते पाहत आहे तर परत का तेच रिमेक बनवून सादर केले जात आहे त्यापेक्षा आपल्या कल्पनेवर चित्रपट बनवले पाहिजे त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडेल.' त्याच्या या विधानाची सध्या बरीच चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT